Breaking News
  • 'जगाच्या नकाशावर राहायचं की इतिहासजमा व्हायचं?'; पाकिस्तानला लष्करप्रमुखांचा थेट इशारा
  • यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची बदली
  • अमरावती महानगरपालिकेच्या अधिकृत ओपन स्पेसवर बांधलेली जनावरे जप्त
  • बुलढाण्यात पोलिसांच्या सतर्कतेने बालविवाह रोखला
  • दिवे घाटात दहशत पसरवणाऱ्या बुलेट राजांचा माज पोलिसांनी मोडला!
  • शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट
  • CBI कडून शुभम खैरनारच्या संपर्कातील लोकांची देखील चौकशी
  • रत्नागिरी- जिल्ह्यात CNG GAS चा मोठ्या प्रमाणात तुटवडा
  • मांडवा ते गेट वे प्रवासी जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार;प्रवाशांच्या सुरक्षेसाठी घेतला निर्णय

होम > महाराष्ट्र

नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

राज्यात पुढील 4 दिवस वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा !

Maharashtra Heavy Rain: भारतीय हवामान विभागाने राज्यात 20 ते 24 एप्रिलदरम्यान वादळी पाऊस, गारपीट व विजांचा इशारा दिला आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले गेले आहे


राज्यात पुढील 4 दिवस वादळी पाऊस गारपीट व विजांचा इशारा

Maharashtra Heavy Rain |

मुंबई (Maharashtra Heavy Rain) : भारतीय हवामान विभागाच्या (IMD) पाच दिवसीय अंदाजानुसार राज्यातील विविध भागांत 20 ते 24 एप्रिलदरम्यान वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीट आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण या भागांतील जिल्ह्यांनी अधिक दक्षता बाळगावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना

नागरिकांनी संभाव्य धोका टाळण्यासाठी पुढील सूचनांचे पालन करावे:

  • विजांचा कडकडाट ऐकू आला किंवा वीज चमकताना दिसताच तात्काळ सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.
  • झाडाखाली, मोकळ्या शेतात, (Maharashtra Heavy Rain) पाण्याजवळ किंवा लोखंडी वस्तूंच्या जवळ उभे राहणे टाळावे.
  • मोकळ्या जागेत मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर टाळावा.
  • निवाऱ्यापासून दूर असल्यास जमिनीवर आडवे न पडता पाय एकत्र करून खाली बसून राहावे.

प्रशासनासाठी उपाययोजना

राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत:

  • ग्रामपंचायत, पोलीस व आरोग्य विभागांनी तातडीने जनजागृती करावी.
  • रुग्णवाहिका, अग्निशमन दल व आपत्कालीन पथके तयार ठेवावीत.
  • शाळा, सभागृह व सार्वजनिक इमारती सुरक्षित निवाऱ्यासाठी खुल्या ठेवाव्यात.
  • हवामान खात्याचे अद्ययावत इशारे गावपातळीपर्यंत त्वरित पोहोचवावेत.

शेतकरी व आयोजकांसाठी विशेष सूचना

  • शेतकरी बांधवांनी विजांच्या इशाऱ्याच्या (Maharashtra Heavy Rain) काळात शेतातील कामे टाळावीत
  • बांधकाम स्थळांवरील कामकाज तात्पुरते थांबवावे
  • यात्रा, धार्मिक कार्यक्रम व मोठ्या गर्दीचे आयोजन पुढे ढकलावे

अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन

राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले असून संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असेही सांगण्यात आले आहे.

Related to this topic: