Breaking News
  • वर्धा नदीत पाच मुले बुडाली, एकाचा मृतदेह सापडला
  • पुणे विषारी दारू प्रकरण: राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.

होम > महाराष्ट्र

भिवंडी मध्ये मूलचंद कंपाऊंडमधील ऑइलच्या गोदामाला भीषण आग; संपूर्ण कारखाना जळून खाक

भिवंडी तालुक्यातील खाडीपार परिसरातील मूलचंद कंपाऊंड येथे असलेल्या ऑइलच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.


भिवंडी मध्ये मूलचंद कंपाऊंडमधील ऑइलच्या गोदामाला भीषण आग संपूर्ण कारखाना जळून खाक

Bhiwandi Fire​​​​​​​ |

भिवंडी (Bhiwandi Fire) : भिवंडी तालुक्यातील खाडीपार परिसरातील मूलचंद कंपाऊंड येथे असलेल्या ऑइलच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या गोदामात मोठ्या प्रमाणात ऑइलचे ड्रम साठवून ठेवण्यात आले होते. त्यामुळे आग लागल्यानंतर काही क्षणांतच तिने विक्राळ रूप धारण केले.

मिळालेल्या माहितीनुसार, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, ज्वलनशील पदार्थांचा मोठा साठा असल्याने आग वेगाने पसरत संपूर्ण कारखान्याला वेढा घालत अखेर संपूर्ण गोदाम जळून खाक झाले. आगीची तीव्रता इतकी होती की धुराचे प्रचंड लोट आकाशात उसळताना दूरवरूनही दिसत होते.

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाची एक गाडी तात्काळ घटनास्थळी दाखल झाली असून, आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आग नियंत्रणात आणण्यासाठी आणखी गाड्यांची मदत घेण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने, या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, प्रशासनाकडून आगीचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू असून, परिसरात खबरदारीचा उपाय म्हणून सतर्कता ठेवण्यात आली आहे.

Related to this topic: