“राष्ट्र कोहिनूर भीमरायांना सहर्ष देऊ मानवंदना” या घोषवाक्याने चिखली शहरात भीमजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
चिखली (Ambedkar Jayanti) : “राष्ट्र कोहिनूर भीमरायांना सहर्ष देऊ मानवंदना” या घोषवाक्याने चिखली शहरात भीमजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सम्राट अशोक, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, चिखली यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी विजयस्तंभ चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी बोलताना आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले. “शिक्षण, समता आणि बंधुता या तत्वांवर चालत समाजाची उन्नती साधणे हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली आहे,” असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला आ श्वेताताई महाले पाटील,नगराध्यक्ष सर्वश्री पंडितदादा देशमुख, उपाध्यक्ष सौ. वैशालीताई खेडेकर, मुख्याधिकारी प्रशांत बिडगर, भाजप शहराध्यक्ष सागर पुरोहित, गटनेते अमोल खबूतरे, आरोग्य सभापती विष्णू जोगदंडे, शिक्षण सभापती रफीकसेठ, पाणीपुरवठा सभापती दत्ता सुसर, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. सुनंदाताई शिनगारे, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष सौ. नीताताई सोळंकी, नगरसेविका सौ. अश्विनी जाधव, शहर सरचिटणीस युवराज भुसारी, श्याम वाकदकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस विजय खरे, राहुल सवडतकर, बांधकाम सभापती सुहास शेटे, नगरसेवक मोहित व्यवहारे, दीपक खरात, प्रशांत भटकर, सुजित भराड, सौ. उषाताई पवार, भारत पवार, शैलेश देशमुख, विकी शिनगारे, भाई छोटू कांबळे, बाळू भिसे, अमोल सुरडकर, नारायण जाधव, सुमीत जाधव यांच्यासह अनेक मान्यवर व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान भीमगीतांचा गजर, घोषणांनी दुमदुमलेले वातावरण आणि सर्व समाजघटकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे भीमजयंती उत्सवाला विशेष रंगत आली. शेवटी सर्वांना शुभेच्छा देत समाजात समता, बंधुता आणि एकात्मता दृढ करण्याचा संदेश देण्यात आला.