Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > महाराष्ट्र

आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या हस्ते भीमजयंतीनिमित्त अभिवादन; चिखलीत उत्साहपूर्ण वातावरण

“राष्ट्र कोहिनूर भीमरायांना सहर्ष देऊ मानवंदना” या घोषवाक्याने चिखली शहरात भीमजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.


आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या हस्ते भीमजयंतीनिमित्त अभिवादन चिखलीत उत्साहपूर्ण वातावरण

Ambedkar Jayanti |

चिखली (Ambedkar Jayanti) : “राष्ट्र कोहिनूर भीमरायांना सहर्ष देऊ मानवंदना” या घोषवाक्याने चिखली शहरात भीमजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सम्राट अशोक, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, चिखली यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी विजयस्तंभ चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी बोलताना आमदार  श्वेताताई महाले पाटील यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले. “शिक्षण, समता आणि बंधुता या तत्वांवर चालत समाजाची उन्नती साधणे हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली आहे,” असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला आ श्वेताताई महाले पाटील,नगराध्यक्ष सर्वश्री पंडितदादा देशमुख, उपाध्यक्ष सौ. वैशालीताई खेडेकर, मुख्याधिकारी प्रशांत बिडगर, भाजप शहराध्यक्ष सागर पुरोहित, गटनेते अमोल खबूतरे, आरोग्य सभापती विष्णू जोगदंडे, शिक्षण सभापती रफीकसेठ, पाणीपुरवठा सभापती दत्ता सुसर, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. सुनंदाताई शिनगारे, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष सौ. नीताताई सोळंकी, नगरसेविका सौ. अश्विनी जाधव, शहर सरचिटणीस युवराज भुसारी, श्याम वाकदकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस विजय खरे, राहुल सवडतकर, बांधकाम सभापती सुहास शेटे, नगरसेवक मोहित व्यवहारे, दीपक खरात, प्रशांत भटकर, सुजित भराड, सौ. उषाताई पवार, भारत पवार, शैलेश देशमुख, विकी शिनगारे, भाई छोटू कांबळे, बाळू भिसे, अमोल सुरडकर, नारायण जाधव, सुमीत जाधव यांच्यासह अनेक मान्यवर व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान भीमगीतांचा गजर, घोषणांनी दुमदुमलेले वातावरण आणि सर्व समाजघटकांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे भीमजयंती उत्सवाला विशेष रंगत आली. शेवटी सर्वांना शुभेच्छा देत समाजात समता, बंधुता आणि एकात्मता दृढ करण्याचा संदेश देण्यात आला.

Related to this topic: