Breaking News
  • Washim : ऑनलाईन औषध विक्रीविरोधात आज एक दिवसीय देशव्यापी बंद
  • Nagpur : ऑल इंडिया मेडिकल संघटनेच्या बंदचा नागपूर येथील रुग्णांवर परिणाम
  • Nagpur : १ जुलैपासून HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई
  • जालन्यात गॅस टंचाईचा फटका,पुरीभाजीच्या दरात 10 रुपयांनी वाढ
  • हिंगोलीच्या भाजी मंडई परिसरात आठ दिवसांपूर्वी शेवगा तीस रुपये होता आता या शेवग्याचा प्रति किलो दर 50 रुपये झाला आहे.
  • पुण्यातील बालाजी नगरमध्ये गोळीबार
  • श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावात गेल्या पंधरा दिवसात चौथा बिबट्या जेरबंद झाला आहे
  • नाशिक जिल्ह्यातील ९ हजारांहून अधिक केमिस्ट संपात सहभागी
  • नाशिकमध्ये मेडिकल असोसिएशनच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

होम > आरोग्य

हिंगोली जिल्हा रुग्णालय

हिंगोली जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव; महाराष्ट्र दिनी सत्काराची शिफारस

Hingoli District Hospital: हिंगोलीतील विविध विभागांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा महाराष्ट्र दिनानिमित्त सन्मानित करण्याची शिफारस जिल्हा शल्यचिकित्सकांनी


हिंगोली जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव महाराष्ट्र दिनी सत्काराची शिफारस

Hingoli District Hospital |

हिंगोली (Hingoli District Hospital) : जिल्हा सामान्य रुग्णालय येथील विविध विभागांमध्ये उत्कृष्ट आरोग्य सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने गौरव करण्याची शिफारस जिल्हा शल्यचिकित्सकांनी केली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आलेल्या पत्रानुसार, एन.आर.सी. तसेच आयुष्मान भारत डिजिटल योजनेअंतर्गत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांची माहिती सादर करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांना १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्याची विनंती करण्यात आली आहे.

यामध्ये (Hingoli District Hospital) जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांचे एनआरसी व डिजिटल आयुष्मान भारत योजनेअंतर्गत नेतृत्व, डॉ. गोपाल कदम यांचे एनआरसी विभागातील उत्कृष्ट काम, डॉ. मनीष बगडिया यांचे अस्थिरोग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, डॉ. बालाजी भाकरे यांचे ई-संजीवनी सेवेत योगदान, तसेच डॉ. फैसल एस. खान यांचे मुख कर्करोग उपचार व निदान क्षेत्रातील कार्य विशेष उल्लेखनीय ठरले आहे.

याशिवाय एन.टी.सी.पी. समुपदेशक आनंद साळवे यांनी कोटपा अधिनियम २००३ च्या प्रभावी अंमलबजावणीत केलेले कार्यही प्रशंसनीय मानण्यात आले आहे. या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Related to this topic: