तालुक्यात संभाव्य पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी मौजे धाड येथे आज महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.
बुलढाणा तालुक्यात पाणीटंचाई टाळण्यासाठी आढावा बैठक; तातडीच्या उपाययोजनांना गती देण्याच्या सूचना
बुलढाणा (Water Crisis Prevention) : तालुक्यात संभाव्य पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी मौजे धाड येथे आज महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. चिखली विधानसभा मतदारसंघातील या बैठकीत संबंधित विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
नागरिकांना सुलभ व नियमित पाणीपुरवठा मिळावा यासाठी हातपंप दुरुस्ती, विहीर अधिग्रहण, विहीर दुरुस्ती तसेच पाईपलाईनची कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यासोबतच ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत सुरू असलेली प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.
सदर योजनेअंतर्गत ३४ गावांपैकी १६ गावांच्या पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. उर्वरित योजनांसाठी केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध झाला असून तो लवकरच संबंधित विभागांना वितरित होणार आहे. त्यामुळे प्रलंबित योजना तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडील कामेही गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.
या बैठकीस गटविकास अधिकारी अमिता पवार, देविदास पाटील जाधव (जिल्हा उपाध्यक्ष, भाजप), संजय गाडेकर (जिल्हा उपाध्यक्ष, भाजप), नायब तहसीलदार अनंता पाटील, श्रीरंग अण्णा वेंडोले, ॲड. सुनील देशमुख, अनिल जाधव (तालुका अध्यक्ष, भाजप), योगेश राजपूत (जिल्हाध्यक्ष, व्हीजेएनटी सेल), नीलेश गुजर (उपजिल्हा प्रमुख, शिवसेना), प्रदीप टाकसाळ (तालुका अध्यक्ष, युवा मोर्चा), अमोल शिंदे, विशाल वीसपुते (जिल्हा उपाध्यक्ष, युवा मोर्चा), नीतेश खुसाळकर (उपअभियंता, पाणीपुरवठा), किरण पाटील (उपकार्यकारी अभियंता, जीवन प्राधिकरण), तसेच महावितरणचे प्रतिनिधी, निलेश देठे (तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस) यांच्यासह सरपंच, ग्रामसेवक व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रशासन सज्ज असून विविध उपाययोजना तातडीने राबवून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.