Breaking News
  • वर्धा नदीत पाच मुले बुडाली, एकाचा मृतदेह सापडला
  • पुणे विषारी दारू प्रकरण: राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली स्मार्ट मीटर

जून्या मीटर सोबत तक्रारीही गेल्या;  स्मार्ट मीटर बसल्याचा परिणाम

Hingoli Smart Meter: हिंगोली जिल्ह्यात स्मार्ट मीटरची स्थापना करण्यात आली आहे, ज्यामुळे वीज बिलाबाबतच्या तक्रारी कमी झाली आहेत. पारंपरिक मीटरच्या स्थानापासून डिजिटल मीटर


जून्या मीटर सोबत तक्रारीही गेल्या  स्मार्ट मीटर बसल्याचा परिणाम

Hingoli Smart Meter |

 

डिजीटल व अचूक रिडींगमुळे संशयच संपला

हिंगोली (Hingoli Smart Meter) : हिंगोली जिल्ह्यात महावितरणने राबवलेल्या स्मार्ट मीटर मोहिमेचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. जुन्या पारंपरिक मीटरच्या जागी अत्याधुनिक स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिलासंदर्भातील ग्राहकांच्या तक्रारी जवळपास संपुष्टात आल्या आहेत. यामुळे महावितरणच्या मीटर टेस्टिंग विभागातील कामाचा ताण कमालीचा कमी झाला आहे.

पूर्वी ‘मीटर जास्त पळते’, ‘वापर नसताना बिल जास्त येते’ अशा तक्रारी घेऊन ग्राहकांची महावितरण कार्यालयात रोज गर्दी असायची. जुने मीटर तपासणीसाठी प्रयोगशाळेत रांगा लागत होत्या. मात्र स्मार्ट मीटर बसवल्यापासून हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. (Hingoli Smart Meter) डिजिटल आणि अचूक रीडिंगमुळे बिलाबाबतचा संशयच संपला असून ग्राहक- महावितरण मधील वादाचे प्रसंग थांबले आहेत. आता महावितरणची कार्यपद्धतीही बदलली आहे.

कर्मचारी जागेवर जाऊन पाहणी करतात आणि फक्त तांत्रिक बिघाड किंवा शंका असल्यासच मीटर तपासणीसाठी आणले जाते. ग्राहकाने स्वतः लेखी तक्रार दिल्यासच मीटरची पडताळणी केली जाते. सरसकट मीटर टेस्टिंगची पद्धत बंद झाल्याने कर्मचार्‍यांचा वेळ वाचतो आहे आणि ग्राहकांचे कार्यालयातील हेलपाटेही थांबले आहेत. मीटर तपासणी विभागात पूर्वी मीटरचा ढीग असायचा, तिथे आता शुकशुकाट आहे. 

केवळ अत्यावश्यक प्रकरणांमधील मोजकीच मीटर तपासली जात आहेत. (Hingoli Smart Meter) वीज वापराचे अचूक वर्गीकरण होत असल्याने ग्राहकांचा महावितरणवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. हिंगोलीत महावितरणचा हा तंत्रज्ञानाधारित बदल ग्राहकांसाठी दिलासादायक ठरत आहे.

Related to this topic: