Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली : शक्तीपीठ महामार्गाचा नाद करू नये, संतप्त शेतकऱ्यांचा पालकमंत्र्यांना इशारा

प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गावरून अनेक शेतकऱ्यांनी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.


हिंगोली  शक्तीपीठ महामार्गाचा नाद करू नये संतप्त शेतकऱ्यांचा पालकमंत्र्यांना इशारा

Shaktipeeth Highway |

हिंगोली (Shaktipeeth Highway) : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गावरून अनेक शेतकऱ्यांनी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. “शक्तीपीठ महामार्गाचा नाद कोणी करू नये. हा महामार्ग शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा आहे,” असा थेट इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

नागपूर ते गोवा या महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गामुळे मराठवाडा व विदर्भातील 11 जिल्ह्यांतील हजारो हेक्टर शेती बाधित होणार आहे. हिंगोली जिल्ह्यातूनही हा महामार्ग जाणार असून, सुपीक जमिनी, विहिरी, फळबागा संपुष्टात येण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार आष्टीकर यांनी शेतकऱ्यांची बाजू उचलून धरली.

“विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचा बळी देणार असाल तर ते खपवून घेतले जाणार नाही. आधीच हिंगोली जिल्हा अवर्षणग्रस्त आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यांना देशोधडीला लावण्याचा डाव आम्ही हाणून पाडू,” असे आष्टीकर म्हणाले.

शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच जिल्ह्यात विरोधाचे सूर उमटू लागले आहेत. “समृद्धी महामार्गाचे काय झाले ते जनतेने पाहिले. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला नाही. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. तेच शक्तीपीठ महामार्गात होऊ देणार नाही. गरज भासल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू,” असा इशारा खासदारांनी दिला.

दरम्यान, महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बैठका जिल्ह्यात सुरू झाल्या आहेत. खासदार आष्टीकर यांनीही लवकरच शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन पुढील दिशा ठरवणार असल्याचे सांगितले. “शेतकऱ्यांच्या हितापेक्षा काहीही मोठे नाही. हा महामार्ग रद्द करा किंवा पर्यायी मार्ग काढा, अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जा,” असा थेट संदेश त्यांनी सरकारला दिला आहे. पालकमंत्री शुक्रवारी वर्धापन दिनाच्या ध्वजारोहण सोहळ्याला आले असता हा सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासकीय बैठकांसाठी आले होते त्यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी हा महामार्ग कदापिही होऊ दिला जाणार नाही असा इशारा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांना दिला.

Related to this topic: