Breaking News
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे दुःखद निधन
  • मुंबई हादरले; बिर्याणी-कलिंगड खाल्यानंतर चौघांचा संशयास्पद मृत्यू!
  • नायानगर परिसरात ‘कलमा’चा दबाव... मुंबई मध्ये पहाटेचा थरारक हल्ला!
  • भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राघव चड्ढाचा पहिला व्हिडिओ व्हायरल
  • जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मे पासून सुरुवात
  • 'जल संरक्षण' हीच खरी शिवपूजा: आ. श्वेता महाले
  • आरक्षणाचे तुकडे करून जाती-जातींत भांडणे लावण्याचे षडयंत्र: आ. राजकुमार बडोले
  • किंग कोहलीने रचला IPL च्या इतिहासात चौकारांचा नवा विश्वविक्रम
  • अखेर तापत्या उन्हात शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षक संघटनेची मागणी नाकारली

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

भाजप प्रज्ञा सातव

प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेच्या पोट निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी जाहीर

BJP Pragya Satav: डॉ. प्रज्ञा सातव यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर, त्यांना विधान परिषदेच्या पोट निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी त्या याच जागेवर होत्या.


प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेच्या पोट निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी जाहीर 

BJP Pragya Satav |

दैनिक देशोन्नतीने आधीच व्यक्त केले होते भाकीत

हिंगोली (BJP Pragya Satav) : विधान परिषदेच्या ज्या जागेचा डॉक्टर प्रज्ञा सातव (BJP Pragya Satav) यांनी राजीनामा दिला होता त्याच जागेवर त्यांना भारतीय जनता पक्षाने पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. याबाबत दैनिक देशोन्नतीने यापूर्वीच भाकीत केले होते. 
   
महाराष्ट्र विधानसभे तील 10 रिक्त जागांसाठी 12 मे रोजी निवडणूक होणार आहे. यातील नऊ जागा कार्यकाळ पूर्ण झाल्याने रिक्त झाल्या असून एका जागे वर पोटनिवडणूक होत आहे. ही जागा डॉ. प्रज्ञा सातव यांनी यापूर्वी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झाली होती. त्याच जागेवर त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर पक्षातर्फे त्यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव (BJP Pragya Satav) यांना दुसऱ्यांदा विधान परिषदेवर काँग्रेसने पाठविले होते. या जागेचा त्यांनी अचानक राजीनामा दिला. या जागे सोबत त्यांनी काँग्रेस पक्षाचाही राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला होता. या प्रवेशाच्या वेळीच त्यांना भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी देण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला असल्याची चर्चा होती. त्यानुसार 2030 पर्यंतच्या कार्यकाळासाठी डॉ. प्रज्ञा सातव यांच्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा मार्ग मोकळा झाला आहे.

विरोधी पक्षातून आलेल्या दोघांचे भाजपने केले पुनर्वसन

विरोधी पक्षातून आलेल्या दोन नेत्यांचे भारतीय जनता पक्षाने पुनर्वसन केले आहे. यापूर्वी रामराव वडकुते यांना पक्षाने राज्यसभेवर घेतले आहे रामराव वडकुते हे राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते होते. पक्षाने त्यांना विधान परिषदेवर पाठविले होते. विधान परिषदेचा काही काळ शिल्लक असताना रामराव वडकुते यांनी पदाचा व पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यांना राज्यसभेवर घेतल्यानंतर आता काँग्रेस मधून आलेल्या डॉक्टर प्रज्ञा सातव (BJP Pragya Satav) यांना परत विधान परिषदेवर घेऊन भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षातून घेतलेल्या दोन नेत्यांचे पुनर्वसन केले आहे. हे दोन्ही नेते ओबीसी मतदारांचे प्रतिनिधी असल्याने भविष्यात या नेत्यांचा पक्षाला काय उपयोग होतो याकडे आता सर्वांचे लक्ष राहील.

Related to this topic: