Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > उत्त्तर महाराष्ट्र > जळगाव

हसत-खेळत निघाली… पण परतलीच नाही; अपघातात नववधूसह तिघांचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात बुधवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.


हसत-खेळत निघाली… पण परतलीच नाही अपघातात नववधूसह तिघांचा मृत्यू

Newlywed Tragedy |

जळगाव (Newlywed Tragedy) : जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात बुधवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. वऱ्हाड (वराड) गावाजवळ सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. वापीहून अकोल्याकडे प्रवास करणाऱ्या क्रूझर वाहनाचे चालू स्थितीतच एक चाक अचानक निखळल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्यावर पलटी झाली. या भीषण अपघातात नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अकोला येथील पूजा रवी वाडकर (वय २२) यांचा विवाह नुकताच वापी येथे पार पडला होता. लग्नानंतर पहिल्यांदाच त्या आपल्या नातेवाईकांसोबत माहेरी परतत होत्या. नव्या आयुष्याच्या सुरुवातीचा आनंद, भविष्यातील स्वप्नं आणि कुटुंबियांची ओढ मनात घेऊन सुरू झालेला हा प्रवास दुर्दैवी ठरला. नियतीच्या एका अनपेक्षित वळणाने त्यांच्या आयुष्याला अकाली विराम मिळाला.

अपघातावेळी एमएच ३० एझेड ४७१० क्रमांकाचे वाहन धरणगाव तालुक्यातील वऱ्हाड गावाजवळून जात होते. याच दरम्यान गाडीचे एक चाक अचानक निखळले. वाहनाचा वेग अधिक असल्याने चालकाला परिस्थितीवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि गाडी रस्त्यावर उलटली. या अपघाताची तीव्रता इतकी होती की, नववधू पूजा रवी वाडकर यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या सोबतच दत्तू तुळशीराम भागवत (वय ४२) आणि जगदीश चंद्रभान वाकडकर (वय ५२) यांनाही प्राण गमवावे लागले.

या दुर्घटनेत अन्य सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये प्रेम भारत वाकडकर (वय २४), नितेश सुरेश काठोडे (वय ३५), अमोल दामोदर गीते (वय ३५), रवी प्रभाकर वाघोडकर (वय ३२), तुळशीराम भीमराव भागवत (वय ६७) तसेच १४ वर्षीय अंश नितेश काठोडे यांचा समावेश आहे. सर्व जखमींना गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्याचे सांगितले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना त्वरित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे उपचारासाठी हलवण्यात आले.

या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, एका नव्या संसाराची सुरुवात होण्याआधीच त्यावर काळाने घाला घातल्याची भावना व्यक्त होत आहे. संबंधित प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Related to this topic: