Breaking News
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का
  • हनुमान जयंतीच्या शोभायात्रेत बेपत्ता झालेल्या बालकाचा संशयास्पद मृत्यू
  • लग्नसोहळ्यात थरार! पुतण्याच्या हल्ल्यात काका-चुलत भावाचा खून
  • इराणची विनाशकारी योजना; गूगल, मायक्रोसॉफ्ट, अमेझॉनची कार्यालये उडवण्याची धमकी
  • IAS तुकाराम मुंढे यांची 21 वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल '24 वेळा' बदली
  • नासाची आर्टेमिस-2 मोहीम; 54 वर्षांनंतर मानव पुन्हा चंद्र मोहिमेकडे
  • 'कूपर कॉनोली' ठरला पंजाब किंग्सच्या विजयाचा हिरो

होम > आपले शहर > मराठवाडा > नांदेड

मातंग समाज एल्गार

अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणासाठी नांदेडमध्ये मातंग समाजाचा एल्गार

Matang Samaj Elgar: नांदेडमध्ये मातंग समाजाने आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी धरणे आंदोलन केले. महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या आरक्षणात मातंग समाजाला न्याय मिळावा.


अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणासाठी नांदेडमध्ये मातंग समाजाचा एल्गार

Matang Samaj Elgar |

माजी आमदार अविनाश घाटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची महाराष्ट्रात अंमलबजावणी करण्याची मागणी

​नांदेड (Matang Samaj Elgar) : अनुसूचित जातीच्या आरक्षणात तात्काळ उपवर्गीकरण करून मातंग व इतर वंचित जातींना न्याय द्यावा, या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी नांदेडमध्ये मातंग समाज आक्रमक झाला. 'मातंग समाज समन्वय समिती'च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन (Matang Samaj Elgar) करण्यात आले. जोपर्यंत उपवर्गीकरण लागू होत नाही, तोपर्यंत राज्य सरकारने सुरू केलेली मेगा नोकर भरती तात्काळ स्थगित करावी, असा इशारा माजी आमदार अविनाश घाटे यांनी  दिला.

​यावेळी बोलताना अविनाश घाटे म्हणाले की, "महाराष्ट्रात अनुसूचित जातीसाठी असलेल्या १३% आरक्षणाचा लाभ केवळ मोजक्याच २ ते ३ जातींना मिळत आहे. मातंग आणि तत्सम इतर जाती मुख्य प्रवाहापासून दूर फेकल्या गेल्या आहेत. यासाठी समाज मागील २५ वर्षांपासून संघर्ष करत आहे. १ ऑगस्ट २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत राज्यांना उपवर्गीकरण करण्याचे अधिकार दिले आहेत. पंजाब, हरियाणा, तेलंगणा यांसारख्या राज्यांनी याची अंमलबजावणीही सुरू केली आहे, मात्र पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात अद्याप हे पाऊल उचलले गेलेले नाही." महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या न्या. अनंत बदर समितीने आपला अहवाल सादर केला असला, तरी सरकार या प्रक्रियेत कमालीची दिरंगाई करत आहे. एकीकडे उपवर्गीकरणाचा निर्णय प्रलंबित असताना दुसरीकडे सरकारने मोठी नोकर भरती (मेगा भरती) सुरू केली आहे. यामुळे (Matang Samaj Elgar) मातंग समाजातील सुशिक्षित तरुणांचे शैक्षणिक आणि नोकरीविषयक प्रचंड नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

​अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करून तात्काळ अंमलबजावणी सुरू करावी.जोपर्यंत आरक्षणाचे उपवर्गीकरण लागू होत नाही, तोपर्यंत कर्नाटक राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातील सर्व नोकर भरती तात्काळ स्थगित करण्यात यावी.अशी मागणी मातंग समाज समन्वय समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. जर सरकारने या मागण्यांची तातडीने दखल घेतली नाही, तर आगामी काळात संपूर्ण राज्यात तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन छेडले जाईल, असा इशाराही समन्वय समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

​या आंदोलनात मातंग समाज (Matang Samaj Elgar) समन्वय समितीचे राज्य समन्वयक माजी.आ.अविनाशराव घाटे,केशव शेकापूरकर, सतीश कावडे, गणेश तादलापूरकर, प्रा.जी.एल.सुर्यवंशी, देविदास इंगळे,पंडित वाघमारे,गणपतराव गायकवाड,नगरसेवक हेमंत घाटे यांच्यासह मातंग समाजातील विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related to this topic: