Breaking News
  • रत्नागिरी- जिल्ह्यात सीनजी सोबतच पेट्रोल डिझेलचा देखील तुटवडा
  • सीबीआयचे पथक आजही लातूरमध्ये तळ ठोकून, खाजगी कोचिंग क्लासेससह काही पालकांची देखील होणार आज चौकशी
  • NEET पेपर फुटी प्रकरणी CBI च्या अटकेत असलेल्या मनीषा मांढरे यांचं होणार निलंबन
  • बीड मध्ये अधिकमासाच्या पहिल्याच दिवशी विविध भाविकांच्या ५० तोळे सोन्यावर चोरट्यांचा डल्ला
  • NEET पेपर फुटीप्रकरणी RCC क्लासचे शिवराज मोटेगावकर यांना अटक
  • नीट पेपर फुटी प्रकरणाचा निषेध करत छावा विद्यार्थी आघाडीच्या वतीने नांदेडमध्ये आंदोलन
  • कल्याणमध्ये धक्कादायक घटना! चक्की नाका परिसरातील म्हशींचा तबेला कोसळला
  • शिवसेना नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेच्या आढावा बैठकीला सुरुवात
  • पिंपरी-चिंचवडमध्ये आज अचानक इंधनाचा तुटवडा, जवळपास 80% पेट्रोल पंप बंद

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोलीत नगरपालिकेची तत्परता : शिवशक्ती नगरमधील तुंबलेली गटार मोकळी, नागरिकांत समाधान

शहरातील शिवशक्ती नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून भूमिगत गटारीतील पाणी तुंबल्याने रस्त्यावर घाण पाणी वाहत होते.


हिंगोलीत नगरपालिकेची तत्परता  शिवशक्ती नगरमधील तुंबलेली गटार मोकळी नागरिकांत समाधान

Municipal Action |

हिंगोली (Municipal Action) : शहरातील शिवशक्ती नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून भूमिगत गटारीतील पाणी तुंबल्याने रस्त्यावर घाण पाणी वाहत होते. या समस्येमुळे नागरिकांना दुर्गंधी व आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. नागरिकांची ही गैरसोय लक्षात घेऊन प्रभाग क्रमांक 9 चे नगरसेवक तथा उपाध्यक्ष अब्दुल माबुद बागवान व चंदू लव्हाळे यांनी तातडीने पावले उचलली.

त्यांनी थेट नगराध्यक्ष सौ. रेखाताई बांगर, गटनेते श्रीराम बांगर आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची कल्पना दिली. या तक्रारीची गंभीर दखल घेत नगरपालिका प्रशासनाने तात्काळ स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. आदेश मिळताच स्वच्छता विभागाचे पथक यंत्रसामुग्रीसह घटनास्थळी दाखल झाले आणि भूमिगत गटार योजनेतील तुंबलेले पाणी मोकळे करून पाण्याला वाट मोकळी करून दिली.

नगरपालिकेच्या या जलद कार्यवाहीमुळे शिवशक्ती नगरमधील रस्ते मोकळे झाले असून नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेबद्दल तसेच स्थानिक नगरसेवकांनी नागरिकांच्या समस्येला प्राधान्य दिल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. एका जबाबदार लोकप्रतिनिधी आणि जागरूक प्रशासनाच्या समन्वयातून प्रश्न सुटू शकतो याचे हे उदाहरण ठरले आहे.

Related to this topic: