Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा

साहित्यिक मनोहर पवार

आंब्याच्या झाडावरून पडून साहित्यिक तथा शाहीर मनोहर पवार यांचा दुर्दैवी मृत्यू

Literary Manohar Pawar: ज्येष्ठ साहित्यिक आणि शाहीर मनोहर पवार यांचा आंब्याच्या झाडावरून पडून मृत्यू झाला. त्यांचा २२ मेला दगडावर आदळून गंभीर अपघात झाला.


आंब्याच्या झाडावरून पडून साहित्यिक तथा शाहीर मनोहर पवार यांचा दुर्दैवी मृत्यू

Literary Manohar Pawar |

चिखली (Literary Manohar Pawar) : केळवद येथील ज्येष्ठ साहित्यिक, कवी तथा शाहीर मनोहर पवार यांचे शुक्रवारी दुपारी झालेल्या दुर्दैवी अपघातात निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे साहित्य, शाहिरी आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. मूळचे केळवद येथील व सध्या गवळीपुरा, चिखली येथे वास्तव्यास असलेले मनोहर पवार हे साहित्याशी घट्ट नाळ जोडून आयुष्यभर कार्यरत होते. दि. २२ मे रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास ते आपल्या शेतातील आंब्याच्या झाडावर आंबे तोडत असताना अचानक त्यांचा तोल गेला. झाडावरून खाली पडताना ते थेट दगडावर आदळल्याने गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मनोहर पवार (Literary Manohar Pawar) हे केवळ शाहीर नव्हते, तर समाजमनाला दिशा देणारे संवेदनशील साहित्यिक म्हणूनही त्यांची ओळख होती. आपल्या ओजस्वी शाहिरीतून, कवितांमधून आणि लेखणीतून त्यांनी सामाजिक प्रश्नांवर प्रखर भाष्य केले. आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही त्यांनी साहित्याची बांधिलकी कधीच सोडली नाही. शेती आणि पेंटरचा व्यवसाय सांभाळत त्यांनी शाहिरी आणि साहित्यसेवा अखंड सुरू ठेवली. तालुका, जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या विविध साहित्य संमेलनांमध्ये आणि साहित्यिक कार्यक्रमांमध्ये ते आवर्जून सहभागी होत असत. साहित्यिक चळवळीशी असलेली त्यांची निष्ठा आणि तळमळ अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली होती.

त्यांचे वडील स्वर्गीय रामभाऊ पवार हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध शाहीर होते. त्यांचाच शाहिरीचा वारसा मनोहर पवार (Literary Manohar Pawar) यांनी समर्थपणे पुढे चालवला. आपल्या वडिलांची परंपरा जपत त्यांनी ग्रामीण भागातील शाहिरी आणि लोकसाहित्य जिवंत ठेवण्याचे मोठे कार्य केले. त्यांच्या निधनाने केवळ एका साहित्यिकाचा नव्हे, तर लोककलेचा जिवंत वारसा हरपल्याची भावना साहित्यप्रेमींमध्ये व्यक्त होत आहे. विविध साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. स्व. मनोहर पवार यांचा अंत्यविधी शनिवार दि. २३ मे रोजी सकाळी ११ वाजता केळवद येथे होणार आहे.

Related to this topic: