Breaking News
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे दुःखद निधन
  • मुंबई हादरले; बिर्याणी-कलिंगड खाल्यानंतर चौघांचा संशयास्पद मृत्यू!
  • नायानगर परिसरात ‘कलमा’चा दबाव... मुंबई मध्ये पहाटेचा थरारक हल्ला!
  • भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राघव चड्ढाचा पहिला व्हिडिओ व्हायरल
  • जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मे पासून सुरुवात
  • 'जल संरक्षण' हीच खरी शिवपूजा: आ. श्वेता महाले
  • आरक्षणाचे तुकडे करून जाती-जातींत भांडणे लावण्याचे षडयंत्र: आ. राजकुमार बडोले
  • किंग कोहलीने रचला IPL च्या इतिहासात चौकारांचा नवा विश्वविक्रम
  • अखेर तापत्या उन्हात शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षक संघटनेची मागणी नाकारली

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

ईसापुर धरण मृत्यू

ईसापुर धरणात बुडून ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Isapur Dam Death: हिंगोली जिल्ह्यातील अरविंद वाघमारे यांचा ईसापुर धरणात बुडून मृत्यू झाला. २८ एप्रिल रोजी ते धरणात पोहण्यासाठी गेले होते


ईसापुर धरणात बुडून ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Isapur Dam Death |

हिंगोली (Isapur Dam Death) : हिंगोली जिल्ह्यातील कलगाव येथील ३५ वर्षीय अरविंद चंद्रमुनी वाघमारे यांचा ईसापुर धरणाच्या पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. अरविंद वाघमारे हे  सासुरवाडी सुकळी वळण येथे आले होते. २८ एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ते पोहण्यासाठी ईसापुर धरणाच्या (Isapur Dam Death) पात्रात गेले असल्याची  माहिती नातेवाईकाने दिली मात्र, त्यानंतर ते परत न आल्याने शोध सुरू करण्यात आला. २९ एप्रिल रोजी दुपारी त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि गावकर्‍यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह (Isapur Dam Death) पाण्याबाहेर काढला.यावेळी कळमनुरी पोलीस ठाण्याचे  पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे, बीट जमादार संजय राठोड, अरविंद राठोड, कानबाराव हराळ, किशोर खिल्लारे यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. त्यांच्यावर शवविच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी,तीन मुलं, भाया, जाऊ,सासू , एक भाऊ, दोन बहिणी असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर कलगाव येथील स्मशानभूमीत  २९ एप्रिल रोजी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आला.  या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Related to this topic: