Inadequate water supply: हिंगोली शहरात अपुरा पाणी पुरवठा झाल्याने संतप्त नागरीकांनी आदर्श महाविद्यालयाच्या जलकुंभावर धाव घेतली आणि पाणी पुरवठा सोडणार्या कर्मचार्यास जाब विचारला.
हिंगोली (Inadequate water supply) : शहरात पाणी पुरवठ्याची ओरड सुरू असताना जिजामाता नगर भागात सोमवारी अपुरा पाणी पुरवठा सोडल्याने अनेक संतप्त नागरीक चक्क जलकुंभावर धडकले.
हिंगोली शहरात पाणी पुरवठ्याचे ताळतंत्र बिघडले आहे. ६ एप्रिल सोमवार रोजी आदर्श महाविद्यालयाच्या जलकुंभावरून जिजामाता नगर, आंबेडकर नगर आदी भागात पाणी पुरवठा सोडला होता. हा पाणी पुरवठा सोडताच काहीवेळ बंद केला , नंतर अपुरा पाणी पुरवठा झाल्याने या भागातील संतप्त नागरीकांनी चक्क जलकुंभावर धाव घेऊन पाणी पुरवठा सोडणार्या कर्मचार्यास जाब विचारला. अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत.