Hingoli Shri Jaleshwar: हिंगोलीच्या श्री जलेश्वर मंदिर व तलाव परिसराचे सुशोभीकरणाचे काम ४०% पूर्ण झाले पण ६०% काम प्रलंबित आहे. कामाच्या रखडण्यामागे निधीची कमतरता आणि सत्ता परिवर्तन हे कारण असू शकते.
प्रशासनाचे दुर्लक्ष की निधीचा अभाव? नागरिकांमध्ये उलट-सुलट चर्चा
हिंगोली ( Hingoli Shri Jaleshwar) : हिंगोली शहराची ओळख आणि शहराचे सांस्कृतिक वैभव असलेल्या ऐतिहासिक श्री जलेश्वर मंदिर व तलाव परिसराच्या सुशोभीकरणाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून ठप्प पडले आहे. या परिसराचा कायापालट व्हावा, या उद्देशाने प्रशासनाने कामाला सुरुवात तर केली, मात्र सद्यस्थितीत हे काम 'बंद' पडल्यासारखेच असल्याने हिंगोलीकरांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सत्ता परिवर्तन की नियोजनाचा अभाव?
मिळालेल्या माहितीनुसार, या (Hingoli Shri Jaleshwar) प्रकल्पाचे आतापर्यंत केवळ ४० टक्के काम पूर्ण झाले असून तब्बल ६० टक्के काम अद्यापही बाकी आहे. काम बंद पडण्यामागे नेमके कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, हिंगोली नगरपालिकेतील सत्ता परिवर्तन किंवा निधीची कमतरता यांमुळे हे काम रखडले असावे, अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे.
अर्धवट कामामुळे पुन्हा दुरवस्था होण्याची भीती
तलाव परिसराचे सुशोभीकरण व्हावे, यासाठी नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा करत आहेत. काम सुरू झाल्याने आशा पल्लवित झाल्या होत्या, पण आता अर्धवट काम सोडून दिल्याने केलेल्या कामाचेही नुकसान होण्याची शक्यता आहे. जर हे काम वेळीच पूर्ण झाले नाही, तर परिसर पुन्हा 'जैसे थे' अवस्थेत जाण्याची भीती हिंगोलीकरांनी व्यक्त केली आहे.
प्रशासनाने तातडीने निधीचा आढावा घेऊन प्रलंबित रक्कम उपलब्ध करून द्यावी.
स्थानिक लोकप्रतिनिधींनी या विषयाचा पाठपुरावा करून काम पुन्हा सुरू करावे.
कामाचा दर्जा: रखडलेल्या कामामुळे बांधकामाचा दर्जा खराब होणार नाही, याची काळजी घ्यावी.
"श्री जलेश्वर हे हिंगोलीचे वैभव आहे. या ठिकाणचे काम अर्धवट राहणे ही दुर्दैवी बाब आहे. प्रशासनाने आणि राजकीय नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून शहराच्या सौंदर्यीकरणा साठी हे काम तातडीने पूर्ण करावे, अशी आमची मागणी आहे.