Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > मराठवाडा > लातूर

औराद शहाजानीत उष्माघाताचा बळी;  शेतात काम करताना शेतकऱ्याचा मृत्यू

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून उन्हाची तीव्रता सातत्याने वाढत असून तापमानाचा पारा चाळीस अंशांच्या पुढे गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.


औराद शहाजानीत उष्माघाताचा बळी  शेतात काम करताना शेतकऱ्याचा मृत्यू

Heat Stroke |

औराद शहाजानी (Heat Stroke) : निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून उन्हाची तीव्रता सातत्याने वाढत असून तापमानाचा पारा चाळीस अंशांच्या पुढे गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या प्रचंड उकाड्याचा फटका सोमवारी एका शेतकऱ्याला बसला असून शेतात काम करत असताना उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. लक्ष्मण दादाराव भंडारे (वय 60) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

औराद शहाजानी परिसरात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच उष्णतेचा कहर वाढत चालला आहे. दिवसाचे कमाल तापमान 42.8 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून किमान तापमानही 31.5 अंशांवर गेल्याने रात्रंदिवस नागरिक हैराण झाले आहेत. सततच्या उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होत असून शेतकरी, मजूर आणि बाहेर काम करणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत.

सोमवारी दुपारनंतर सुमारे चार वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण भंडारे हे आपल्या शेतात नेहमीप्रमाणे काम करत होते. यावेळी उन्हाचा तडाखा तीव्र असल्याने अचानक त्यांना चक्कर येऊन ते जमिनीवर कोसळले. कुटुंबीय व ग्रामस्थांनी तातडीने त्यांना औराद शहाजानी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी निलंगा येथे हलविण्याचा सल्ला दिला. दरम्यान, निलंग्याकडे नेत असतानाच वाटेत त्यांचा मृत्यू झाला.

मयत लक्ष्मण भंडारे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, पाच मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर मंगळवारी सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत डॉ. मल्लिकार्जुन शंकद यांनी सांगितले की, संबंधित शेतकरी दिवसभर उन्हात शेतीची कामे करत होते. उष्णतेची तीव्रता जास्त असल्याने शरीरातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात कमी झाली. त्यामुळे तीव्र हृदयविकाराचा झटका आला असावा. प्राथमिक पाहता हा उष्माघातामुळे झालेला मृत्यू असल्याचे दिसून येते.

दरम्यान, वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे, डोक्यावर संरक्षण ठेवावे तसेच शेतकरी व मजुरांनी उन्हात दीर्घकाळ काम टाळावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

Related to this topic: