Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

कांदा विक्रीसाठी नेताना काळाचा घाला; भीषण अपघातात पातुरच्या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

कांदा विक्रीसाठी नाशिकच्या बाजारपेठेकडे जात असताना झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात पातुर तालुक्यातील कोसगाव येथील एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.


कांदा विक्रीसाठी नेताना काळाचा घाला भीषण अपघातात पातुरच्या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

Farmer Death |

(Farmer Death) कांदा विक्रीसाठी नाशिकच्या बाजारपेठेकडे जात असताना झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात पातुर तालुक्यातील कोसगाव येथील एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दिलीप दयाराम करवते (वय ४२) असे या मृत शेतकऱ्याचे नाव असून, ही घटना गुरुवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास हिंगोली-कळमनुरी मार्गावर घडली. या अपघातामुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, दिलीप करवते हे गुरुवारी (दि. २) आपल्या दोन सहकाऱ्यांसह मालवाहू वाहनाने (क्र. एमएच ३० बीडी ६२७९) कांदा विक्रीसाठी नाशिककडे निघाले होते. त्यांचे वाहन हिंगोलीपासून पाच ते सात किलोमीटर अंतरावर असताना, मागून येणाऱ्या एका भरधाव कंटेनरने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, करवते हे वाहनातून खाली फेकले गेले आणि थेट कंटेनरच्या खाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर धडक देणारा कंटेनरही घटनास्थळी उलटला.

दिलीप करवते यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, आई आणि भाऊ असा मोठा परिवार आहे. गुरुवारी दुपारी शवविच्छेदनानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे कोसगावसह परिसरात शोककळा पसरली असून, कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्यामुळे शासनाने या शेतकरी कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Related to this topic: