Breaking News
  • आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घोड्यावर बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला
  • धक्कादायक! बुलढाण्यात सिलेंडरचा स्फोट झाल्यानं घराला भीषण आग, 85 वर्षीय वृद्धेचा मृत्यू
  • भिवंडीत तरुणाचा साप गळ्यात घालून स्टंट; व्हिडिओ व्हायरल
  • भाजपचे शहराध्यक्ष नितीन धांडे आमदार व्हावे यासाठी साकडे घालणार- नवनीत राणा
  • नागपूरच्या धरमपेठ परिसरात मध्यरात्री वादातून 20 वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थ्याची चाकूने हत्या करण्यात आली. आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आले असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
  • पेपर लीकनंतर सरकारने NEET परीक्षा रद्द केली!
  • NEET UG 2026 परीक्षा रद्द; प्रकरणाची चौकशी CBI कडून होणार
  • आता नेपाळ जाण्यासाठी 'विशेष ओळखपत्र' दाखवणे अनिवार्य
  • रोहित आणि कोहली MS धोनीच्या खास क्लबमध्ये दाखल!

होम > आपले शहर > विदर्भ > वर्धा

वर्धाकरांच्या संघर्षाला यश; १५ एप्रिलपासून नागपूर-मुंबई दुरांतो वर्धा जंक्शनवर थांबणार

वर्धा जिल्ह्याच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला अखेर यश मिळाले असून १२२८९/१२२९० नागपूर-मुंबई-नागपूर दुरांतो एक्सप्रेसला वर्धा जंक्शन येथे अधिकृत थांबा देण्यात आला आहे.


वर्धाकरांच्या संघर्षाला यश १५ एप्रिलपासून नागपूर-मुंबई दुरांतो वर्धा जंक्शनवर थांबणार

Duronto Express |

वर्धा (Duronto Express) : वर्धा जिल्ह्याच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीला अखेर यश मिळाले असून १२२८९/१२२९० नागपूर-मुंबई-नागपूर दुरांतो एक्सप्रेसला वर्धा जंक्शन येथे अधिकृत थांबा देण्यात आला आहे. येत्या १५ एप्रिल २०२६ पासून हा थांबा सुरू होणार असून प्रवाशांसाठी आरक्षण सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत हा निर्णय घेतला आहे. यामुळे वर्धा व परिसरातील प्रवाशांना मुंबईसाठी जलद आणि सोयीस्कर पर्याय उपलब्ध होणार आहे.

या थांब्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकजभाऊ भोयर तसेच माजी खासदार रामदास तडस यांनी सातत्याने रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. दरम्यान, गाडी क्रमांक १२२९० (नागपूर-मुंबई) साठी वर्धा जंक्शनला स्वतंत्र आरक्षित कोटाही मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये 1AC साठी २, 2AC साठी ६, 3AC साठी ६४ आणि स्लीपरसाठी २० बर्थ उपलब्ध असतील. त्यामुळे प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळणे अधिक सोपे होणार आहे. या रेल्वे गाडीचे आरक्षण सुरू झाले असून, आरक्षण केंद्रांवर तसेच RailOne या ॲपवर तिकीट विक्री सुरू आहे.

थांबा सुरू झाल्याची माहिती मध्य रेल्वेच्या ZRUCC सदस्य तथा भाजप जिल्हा सचिव प्रणव जोशी यांनी दिली असून, या सुविधेमुळे वर्धा जिल्ह्याच्या दळणवळण व्यवस्थेत मोठी सुधारणा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Related to this topic: