Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

हिंगोली जिल्ह्यात सौम्य भूकंपाचे धक्के; नागरिकांनी सतर्क राहावे – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

११  एप्रिल शनिवार रोजी सकाळी सुमारे पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास हिंगोली जिल्ह्यात पांगरा शिंदे गावात केंद्रबिंदू असून, ४.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला.


हिंगोली जिल्ह्यात सौम्य भूकंपाचे धक्के नागरिकांनी सतर्क राहावे – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

Disaster Management |

हिंगोली (Disaster Management) : ११  एप्रिल शनिवार रोजी सकाळी सुमारे पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास हिंगोली जिल्ह्यात पांगरा शिंदे गावात केंद्रबिंदू असून, ४.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती भूकंप मापन केंद्र, नांदेड येथून प्राप्त झाली आहे. या भूकंपाचे सौम्य धक्के शेजारील जिल्ह्यातील काही भागांमध्येही जाणवले आहेत.

सद्यस्थितीत उपलब्ध माहितीनुसार कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याची नोंद नाही. तरीही नागरिकांनी सतर्क राहावे, मात्र कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे सतर्क असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

नागरिकांनी अफवा, खोटे फोन कॉल किंवा अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये व अधिकृत स्त्रोतांकडूनच माहिती घ्यावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

भूकंपाच्या वेळी घ्यावयाची काळजी :

नागरिकांनी शांत राहावे व घाबरू नये. घरामध्ये असल्यास मजबूत टेबल, पलंग किंवा भिंतीच्या कोपर्‍याजवळ आसरा घ्यावा. डोक्याचे संरक्षण करावे. भूकंप थांबल्यानंतर सुरक्षितपणे मोकळ्या जागेत जावे. शक्य असल्यास गॅस व वीज पुरवठा बंद करावा. अधिकृत सूचनांचे पालन करावे. तसेच घाईगडबडीत बाहेर पडण्याचा प्रयत्न करू नये. लिफ्टचा वापर करू नये. अफवा पसरवू नये किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये. विजेच्या तारा, इमारतीतील भेगा किंवा कमकुवत संरचनांच्या जवळ जाऊ नये. अनावश्यक फोन करून नेटवर्क व्यस्त ठेवू नये.

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहित कंजे (९४०५४०८९३९) यांच्याशी व १०७७ या टोल फ्री क्रमांकावर किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.

नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

हिंगोली जिल्ह्यात शनिवारी सकाळच्या सुमारास झालेल्या भूकंपाच्या हादर्‍याने काही ठिकाणी नुकसान झाले आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी प्रशासकीय यंत्रणेला नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सोबतच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनीही नुकसानीचा आढावा घेऊन त्याबाबतचा अहवाल तात्काळ सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या भूकंपामुळे प्रामुख्याने ग्रामीण भागात काही घरांना तडा गेला असून काही ठिकाणी भिंतीही कोसळल्या असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Related to this topic: