शाळेने प्रत्येक वर्षी गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवून समाजासाठी डॉक्टर, इंजिनिअर व जबाबदार नागरिक तयार केले आहेत.
रिसोड (Bhavana Public School) : “ज्ञान हीच शक्ती” या ब्रीदवाक्यासह दूरदृष्टी असलेल्या नेत्या मा. भावना ताई गवळी यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या उद्देशाने पुंडलिक नगर देगाव फाटा,रिसोड येथे ग्रामीण भागातील पहिली CBSE शाळेची स्थापना केली. या शाळेने प्रत्येक वर्षी गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवून समाजासाठी डॉक्टर, इंजिनिअर व जबाबदार नागरिक तयार केले आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्येही ही परंपरा कायम राखत भावना पब्लिक स्कूलने CBSE बोर्डाच्या दहावी परीक्षेत शंभर टक्के निकालाची गौरवशाली कामगिरी केली आहे. हा निकाल १५ एप्रिल रोजी जाहीर झाला.
या निकालात विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले असून त्यापैकी काही गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत:
सार्थक अनिल धोत्रे – ९४%, प्रज्वल शेळके – ९३.४०%, ओम बनकर – ८८.४०%, कृष्णप्रकाश राऊत – ८७.८०%, युवराज देशमुख – ८७.८०%, राज लिमजे – ८७%, जान्हवी तायडे – ८६%, पलक शर्मा – ८५.८०%, भक्ती मुंदडा – ८४%, गायत्री डोईजड – ८३.८०%, प्रगती बाचाटे – ८३.४०%, सारंग कावरखे – ८२.२०%, स्वरूप वाघ – ८२%, शिवानी – ८१.८०%, सार्थक वाघ – ८१.४०%.या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवून शाळेचा नावलौकिक वाढवला असून ताईच्या नियोजनाचे फळ म्हणजे 2025-26 या सत्रातील परिक्षेत भावना पब्लिक शाळेचा विद्यार्थी रिसोड तालुक्यातून प्रथम आला आहे.
या यशाबद्दल शाळेचे संस्थापक अध्यक्षा विद्यमान विधानपरिषद आमदार भावना ताई गवळी, प्राचार्य, शिक्षकवृंद व व्यवस्थापनाने सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. भावना पब्लिक स्कूल ही संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील असून आदर्श नागरिक घडवून आधुनिक समाज घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे आणि भविष्यात सुद्धा आमचे हे प्रयत्न अविरत सुरूच ठेऊ याची शाश्वती सर्वांच्या वतीने देण्यात आली.