Breaking News
  • रत्नागिरी- जिल्ह्यात सीनजी सोबतच पेट्रोल डिझेलचा देखील तुटवडा
  • सीबीआयचे पथक आजही लातूरमध्ये तळ ठोकून, खाजगी कोचिंग क्लासेससह काही पालकांची देखील होणार आज चौकशी
  • NEET पेपर फुटी प्रकरणी CBI च्या अटकेत असलेल्या मनीषा मांढरे यांचं होणार निलंबन
  • बीड मध्ये अधिकमासाच्या पहिल्याच दिवशी विविध भाविकांच्या ५० तोळे सोन्यावर चोरट्यांचा डल्ला
  • NEET पेपर फुटीप्रकरणी RCC क्लासचे शिवराज मोटेगावकर यांना अटक
  • नीट पेपर फुटी प्रकरणाचा निषेध करत छावा विद्यार्थी आघाडीच्या वतीने नांदेडमध्ये आंदोलन
  • कल्याणमध्ये धक्कादायक घटना! चक्की नाका परिसरातील म्हशींचा तबेला कोसळला
  • शिवसेना नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेच्या आढावा बैठकीला सुरुवात
  • पिंपरी-चिंचवडमध्ये आज अचानक इंधनाचा तुटवडा, जवळपास 80% पेट्रोल पंप बंद

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

ग्रामपंचायत वाईगौळ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित!

मानोरा तालुक्यातील वाईगौळ ग्रामपंचायतने महाआवास अभियान प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण २०२३-२४ अंतर्गत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून तृतीय क्रमांकाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळवला आहे.


ग्रामपंचायत वाईगौळ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

Gram Panchayat Award |

मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान

मानोरा (Gram Panchayat Award) : मानोरा तालुक्यातील वाईगौळ ग्रामपंचायतने महाआवास अभियान प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण २०२३-२४ अंतर्गत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून तृतीय क्रमांकाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळवला आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते लोकनियुक्त सरपंच उमेश राठोड महाराज व ग्रामविकास अधिकारी विद्या मारोटकर यांना सातारा येथे प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. वाईगौळ ग्रामपंचायतला तृतीय क्रमांक मिळाल्याने जिल्ह्याचा गौरव वाढला आहे.

मानोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मौजे वाईगौळ येथे महाआवास प्रधानमंत्री योजना ग्रामपंचायतीने नियोजनबद्ध राबविली. केंद्र व राज्य शासनाने याबाबत दखल घेऊन २०२३-२४ अंतर्गत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून महाआवास प्रधानमंत्री योजना ग्रामीण अभियान पुरस्कारासाठी तृतीय क्रमांकाच्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

सदर निवड ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने करण्यात आली असून केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मंत्रालयाकडून ही निवड करण्यात आली.

गावकरी मंडळी, उपसरपंच, सर्व सदस्य, अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्गदर्शनामुळे हे यश प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले.

Related to this topic: