Breaking News
  • वर्धा नदीत पाच मुले बुडाली, एकाचा मृतदेह सापडला
  • पुणे विषारी दारू प्रकरण: राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.

होम > आपले शहर > विदर्भ > वाशिम

ग्रामपंचायत वाईगौळ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित!

मानोरा तालुक्यातील वाईगौळ ग्रामपंचायतने महाआवास अभियान प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण २०२३-२४ अंतर्गत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून तृतीय क्रमांकाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळवला आहे.


ग्रामपंचायत वाईगौळ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

Gram Panchayat Award |

मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान

मानोरा (Gram Panchayat Award) : मानोरा तालुक्यातील वाईगौळ ग्रामपंचायतने महाआवास अभियान प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण २०२३-२४ अंतर्गत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून तृतीय क्रमांकाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळवला आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते लोकनियुक्त सरपंच उमेश राठोड महाराज व ग्रामविकास अधिकारी विद्या मारोटकर यांना सातारा येथे प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. वाईगौळ ग्रामपंचायतला तृतीय क्रमांक मिळाल्याने जिल्ह्याचा गौरव वाढला आहे.

मानोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मौजे वाईगौळ येथे महाआवास प्रधानमंत्री योजना ग्रामपंचायतीने नियोजनबद्ध राबविली. केंद्र व राज्य शासनाने याबाबत दखल घेऊन २०२३-२४ अंतर्गत सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून महाआवास प्रधानमंत्री योजना ग्रामीण अभियान पुरस्कारासाठी तृतीय क्रमांकाच्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

सदर निवड ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने करण्यात आली असून केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मंत्रालयाकडून ही निवड करण्यात आली.

गावकरी मंडळी, उपसरपंच, सर्व सदस्य, अधिकारी व कर्मचारी यांच्या मार्गदर्शनामुळे हे यश प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले.

Related to this topic: