Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आरोग्य

परभणी उष्माघात संकट

परभणीत उष्माघाताचे संकट; मनपा आरोग्य विभाग अलर्ट

Parbhani heatstroke crisis: मार्च महिन्यात सूर्य आग ओकु लागला आहे. दिवसनदिवस तापमाना मध्ये वाढ होत आहे. वाढत्या तापमानामुळे उष्णाघाताचा धोका वाढला आहे. उष्माघाचा धोका टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी


परभणीत उष्माघाताचे संकट मनपा आरोग्य विभाग अलर्ट

Parbhani heatstroke crisis |

काळजी घेण्याचे मनपाचे आवाहन; सरासरीच्या तुलनेत ३ अंशाने अधिक वाढ

परभणी (Parbhani heatstroke crisis) : मार्च महिन्यात सूर्य आग ओकु लागला आहे. दिवसनदिवस तापमाना मध्ये वाढ होत आहे. वाढत्या तापमानामुळे उष्णाघाताचा धोका वाढला आहे. उष्माघाचा धोका टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. 

मार्च महिन्यातील सरासरीच्या तुलनेत तापमान ३ अंशाने अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे उष्णघाताचा धोका वाढला आहे. उन्हात बाहेर कष्टाची कामे करणारे लोक, वृद्ध व्यक्ती, लहान मुले, गरोदर महिला, जाड व्यक्ती, पुरेशे झोप न झालेले व्यक्ती, मधुमेह, र्‍हदयविकार, दारूचे व्यसन असणारे लोक, घट्ट कपडे घातलेले लोक, तसेच इतर अति जोखमीचे कामे करणारे व्यक्ती यांना उष्माघाताचा धोका अधिक असतो. किरकोळ त्रासामध्ये चक्कर येणे, ताप येणे, हातपायला गोळे येणे, अशी लक्षणे दिसतात. तर गंभीर स्वरूपाच्या उष्णतेचा त्रासात त्वचा कोरडी पडणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे,मानसिक बेचैनी व अस्वस्थतता, बेशुद्ध अवस्था अशी लक्षणे दिसतात. काही वेळेस मृत्यू ही होऊ शकतो.  उष्मघाताचे लक्षणे दिसणार्‍या व्यक्तीला वातानुकूलीत खोलीत ठेवावे, खोली हवीशीर असावी, खोलीत पंखे लावावेत, कुलर लावावेत, उष्माघात झालेल्या व्यक्तीच्या शरीरावर तापमान कसे कमी होईल यासाठी प्रयत्न करावेत थंड पाण्याने अंघोळ घालावी, रुग्णाचे कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात.   

आरोग्य विभाग सज्ज
वाढणारा उन्हाचा तडाखा (Parbhani heatstroke crisis) लक्षात घेता आरोग्य विभाग परभणी शहर मनपा मार्फत शहरातील ४ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांत उष्माघात कक्ष स्थापन केले आहेत. त्यामध्ये नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, साखला प्लॉट, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, इनायत नगर, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, खंडोबा बाजार, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, खानापुर. उष्माघाताची लक्षणे आढळून आल्यास नजीकच्या महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्र संपर्क साधावा असे आवाहन महापौर सय्यद इकबाल, उपमहापौर गणेश देशमुख, आयुक्त नितीन नार्वेकर, सभागृह नेते सय्यद समी उर्फ माजुलाला, आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत यांनी केले आहे.

अशी घ्या काळजी....
उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी पुरेसे पाणी प्या, हलक्या फिकट रंगाचे सेलसर कपडे वापरा, उन्हात चष्मा, छत्री, टोपी व पादत्राने वापरावेत, पंखा, कुलर याच्या मदतीने घर थंड ठेवावे, उन्हात जाण्यापूर्वी सनस्क्रीमचा किंवा कोरफडीचा वापर करावा, असे आवाहन  तज्ञ डॉक्टरांनी केले आहे. 

उन्हात हे करणे टाळा 
कष्टाची कामे उन्हात करू नका, शक्यतो उन्हाच्या वेळेस घराबाहेर जाणे टाळा, लहान मुलांना गाडीमध्ये ठेवू नका, मद्यपान,चहा, कॉफी शीतपेय टाळा, शिळे अन्न खाऊ नका, उन्हाच्या काळात भर दुपारी स्वयंपाक करणे टाळा, स्वयंपाक घर हवेशीर ठेवा या प्रकारे खबरदारी घेतल्यास उष्माघाताचा धोका टाळता येऊ शकतो.

Related to this topic: