Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > शेती

खेडी शेतात आग

खेडी शेतात आग लागुन गावालगत पोहचली..

Khedi Farm fire: खेडी गावाजवळ शेतात आग लागली, गावक-यांच्या तत्परतेमुळे आग नियंत्रणात आली आणि मोठे नुकसान टळले.


खेडी शेतात आग लागुन गावालगत पोहचली 

Khedi Farm fire |

गावक-यांच्या बचाव कार्यामुळे गाव आगीपासुन थोडक्या वाचले

कन्हान (Khedi Farm fire) : खेडी गावालगत कापणी झावेल्या गव्हा च्या शेतात अचानक आग लागुन जोरदार वा-यामुळे वाढुन जवळपास ५० एकरातील शेतातील गव्हु पिका चा कचरा जळुन राख झाला. मोठया प्रमाणात गाव करी युवक व नागरिकांच्या बचाव कार्य तसेच कन्हान नगरपरिषदेच्या अग्निशमक दल व बंब वाहनामुळे आगीवर नियंत्रण मिळाल्याने थोडक्यात गाव वाचले. 

शुक्रवार (दि.२७) मार्च ला दुपारी २.३० वाजता दरम्यान अचानक हवामान बदलुन जोरदार वारा वाहु लागला. तेव्हाच खेडी (खोपडी) गावालगत बहुतेक शेतातील गहु हॉरवेस्टर काढल्याने गव्हाचा कचरा शेतात पडुन होता. अश्या कुण्यातरी गहु कापणी झाले ल्या शेतात आग लागुन जोरदार हवेमुळे एका शेतातुन दुस-या शेतात वाढत जाऊन गावाकडे येताना पाहुन गावक-यांनी धाव घेऊन आग विझविण्याचा अतोनात पर्यंत केला. काही गावक-यांनी कन्हान नगरपरिषद आणि तहसिलदार पारशिवनी ला माहिती दिल्याने कन्हान नगरपरिषदेची अग्निशमक दल, बंब वाहन गाडी तातडीने पोहचुन आगीवर नियंत्रण मिळविल्याने खेडी गावातील घरे वाचल्याने थोडक्यात गाव आगी पासुन बचावले.

खेडी शिवारातील जवळपास ५० एकरात ही आग लागुन गव्हाच्या कच-याची राख झाली. काही शेतात गहु पीक कापणी करून गहु ठेव ला होता परंतु लोकांच्या मदतीने तो गहु तात्काळ उच लुन सुरक्षित स्थळी नेण्यात आल्याने गहु पिकाचे नुकसान झाले नाही. ही आग विझविण्याकरिता गावा तील तरूण मंडळी व नागरिकांनी मोठया प्रमाणात धावुन गेले. यात पटवारी ताई, कोतवाल साहेब, विनोद इंगळे, मंगेश कडु, तुकेश घरजाळे, सुशिल ठाकरे, पोलीस पाटील, क्रिष्णा चौधरी, जितेंद्र वैद्य, देवराव इंगळे, दुर्गेश, भीमराव पांडे, रोशन, प्रशांत, प्रकाश, चंद्रशेखर, दिलीप, विनोद, प्रकाश, पांडुरंग, महेंद्र, अजय, प्रल्हाद मोहिते, महिला व पुरुषांनी आग आटोक्यात आण्याकरिता अतोनात पर्यंत केल्याने गाव थोडक्यात आगी पासुन वाचले.

Related to this topic: