Breaking News
  • राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अनुयायी डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे दुःखद निधन
  • मुंबई हादरले; बिर्याणी-कलिंगड खाल्यानंतर चौघांचा संशयास्पद मृत्यू!
  • नायानगर परिसरात ‘कलमा’चा दबाव... मुंबई मध्ये पहाटेचा थरारक हल्ला!
  • भाजपमध्ये सामील झाल्यानंतर राघव चड्ढाचा पहिला व्हिडिओ व्हायरल
  • जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याला १ मे पासून सुरुवात
  • 'जल संरक्षण' हीच खरी शिवपूजा: आ. श्वेता महाले
  • आरक्षणाचे तुकडे करून जाती-जातींत भांडणे लावण्याचे षडयंत्र: आ. राजकुमार बडोले
  • किंग कोहलीने रचला IPL च्या इतिहासात चौकारांचा नवा विश्वविक्रम
  • अखेर तापत्या उन्हात शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षक संघटनेची मागणी नाकारली

होम > शेती

परभणीत पिक विमा

परभणीत पिक विमा भरपाईसाठी आंदोलनाचा इशारा, डॉ. राहुल पाटील यांचा निर्धार

Parbanit crop insurance: परभणीत खरीप हंगाम 2025 दरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या पिकांना नुकसान झाले. डॉ. राहुल पाटील यांनी पिक विमा भरपाई


परभणीत पिक विमा भरपाईसाठी आंदोलनाचा इशारा डॉ राहुल पाटील यांचा निर्धार

Parbanit crop insurance |

आ. डॉ. राहुल पाटील यांनी दिला इशारा खरीप हंगाम २०२५

परभणी (Parbanit crop insurance) : पिक विम्याची रक्कम १५ दिवसात मिळाली पाहीजे,  अन्यथा आंदोलन करु असा इशारा आ.डॉ. राहुल पाटील यांनी दिला आहे. कोरड्या अवस्थेतील पिक कापणी प्रयोगाचा अहवाल कंपनीला तातडीने देऊन कारवाई करा, अशा सुचना आ. पाटील यांनी जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांना केल्या आहेत.

परभणी जिल्ह्यात खरीप हंगाम २०२५ मध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे (Parbanit crop insuranc)e अतोनात नुकसान झाले. जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांनी पिक विमा काढला होता. परंतु शेतकर्‍यांना अद्यापही पीक विम्याची रक्कम मिळाली नाही, संबंधित पिक विमा कंपनीने शासनाच्या काही पीक कापणी धोरणाचा गैरफायदा उचलला आहे. पीक कापणी प्रयोग करताना २०२५ मध्ये सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात पाऊस असल्याने जमिनीत पाणी होते, पिकेही ओली होती, यामुळे शासनाने ओल्या पिकांसोबतच कोरड्या पिकांचे देखील पीक कापणी प्रयोग ग्राह्य धरणाच्या सूचना दिल्या होत्या, त्यामुळे कंपनीने याचा गैरफायदा घेत चुकीचा अर्थ काढत तांत्रिक बाब समोर करत दोन अहवाल कसे काय ?

हा मुद्दा उपस्थित करत परभणी जिल्ह्याचा पिक विमा मंजूर केला नाही. त्यामुळे लाखो शेतकरी पिक विम्याच्या भरपाई पासून वंचित आहेत. वास्तविक मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही पिक विमा कंपनीने तांत्रिक बाब पुढे करत पळवाट काढली आहे. यामुळे आ. डॉ. राहुल पाटील यांनी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांना पिक विमा कंपनीला अहवाल पाठवण्याच्या सूचना केल्या आहेत. कोरड्या पीक कापणीचा अहवाल ग्राह्य धरा आणि लवकर पिक विमा (Parbanit crop insurance) भरपाई द्या, याबाबत तातडीने अहवाल द्या अशा सूचना आ. पाटील यांनी केली आहे. अन्यथा पंधरा दिवसात परभणीत तीव्र आंदोलन करू असा इशारा आ. पाटील यांनी यावेळी दिला.

Related to this topic: