Breaking News
  • हिंगोलीत आरोग्य प्रशासनाचा अनास्थेपना, जिल्ह्यात दाखल झालेल्या तीन शववाहिका धूळखात पडून
  • अमरावती पोलिस अंमलदारच निघाला गुटखा तस्कर; शहर पोलिस दलात खळबळ
  • दुपारी २.३० वाजता पुण्यातील पत्रकार संघात अभिजित दिबके यांची पत्रकार परिषद
  • बुलढाण्यात खडकपूर्णा धरणाच्या पाणीपुरवठा लाईनला गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • पुण्यातील महापौर कार्यालय उडवून देण्याची धमकी
  • बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरमध्ये दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा अपघात
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उद्या दुपारी चार वाजता कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन
  • पुण्यात उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला विद्यापीठाकडून परवानगी
  • पुण्यात बीडीडीएस कडून संपूर्ण पालिका इमारतीचा तपास पूर्ण; बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून महापौर कार्यालय, आयुक्त कार्यालय यासह सगळ्या कार्यालयांची तपासणी

होम > करीअर

पोलीस पाटील पदभरती

प्रशासकीय उदासीनतेचा फटका: भंडारजवासीय नऊ वर्षांपासून 'पोलीस पाटील' पदाच्या प्रतीक्षेत!

Police Patil Recruitment: भंडारज खुर्द आणि भंडारज बु.या गावांमध्ये पोलीस पाटील पद रिक्त असल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणी येत आहेत. शासकीय कागदपत्रांसाठी ८ किलोमीटरची पायपीट करावी लागते.


प्रशासकीय उदासीनतेचा फटका भंडारजवासीय नऊ वर्षांपासून पोलीस पाटील पदाच्या प्रतीक्षेत

Police Patil Recruitment |

 

शासकीय कामांसाठी ८ किलोमीटरची पायपीट; ग्रामस्थांचा संताप आणि संकटांचा पाढा

पातूर (Police Patil Recruitment) : पातूर तालुक्यातील भंडारज खुर्द आणि भंडारज बु. या दोन गावांसाठी प्रशासकीय अनास्था डोकेदुखी ठरत आहे. सुमारे अडीच हजार लोकसंख्या असलेल्या या परिसरात गेल्या ८ ते ९ वर्षांपासून पोलीस पाटील पद रिक्त असल्याने ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहेत.

नांदखेडची वारी अटळ

गावात हक्काचा पोलीस पाटील नसल्याने रहिवासी दाखला, ओळखपत्र आणि इतर अत्यावश्यक शासकीय कागदपत्रांवर स्वाक्षरी मिळवण्यासाठी ग्रामस्थांना सुमारे ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या नांदखेड गावाची वारी करावी लागते. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात असून, कामासाठी दिवसभर ताटकळत राहावे लागत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

गावाच्या सुरक्षेचा आणि विकासाचा प्रश्न

पोलीस पाटील (Police Patil Recruitment) हे केवळ कागदपत्रांसाठी नसून गावातील शांतता राखणे, गुन्हेगारीची माहिती देणे आणि शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी महत्त्वाचे दुवा असतात. मात्र, हे पद रिक्त असल्याने खालील बाबींवर परिणाम होत आहे:

गावातील शांतता व सुव्यवस्थेवर देखरेख ठेवण्यात अडचणी येत आहेत.
नैसर्गिक आपत्ती किंवा साथीच्या आजारांच्या काळात मदतकार्यात समन्वय राहत नाही.
शासकीय योजनांची माहिती नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचत नाही.

प्रतिक्रिया
"पोलिस पाटील (Police Patil Recruitment) नसल्याने नागरिकांनी पायपीट करावी लागते, विद्यार्थ्यांना त्रास होते गावात अनेक पुढारी आहेत परंतु ते फक्त नावापुरते."
-किशोर सुरवाडे (सामाजिक कार्यकर्ते)

वारंवार मागणी करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने, आता भंडारजवासीय आक्रमक भूमिकेत असून लवकरात लवकर या पदावर नियुक्ती करण्याची मागणी होत आहे.

Related to this topic: