Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > मुंबई

उल्हासनगरात भररस्त्यात गोळीबार; दोन सख्ख्या भावांची हत्या, काका गंभीर

उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक ५ परिसरातील कैलास कॉलनी चौकात गुरुवारी संध्याकाळी झालेल्या अंधाधुंद गोळीबाराने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.


उल्हासनगरात भररस्त्यात गोळीबार दोन सख्ख्या भावांची हत्या काका गंभीर

Ulhasnagar Firing |

उल्हासनगर (Ulhasnagar Firing) : उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक ५ परिसरातील कैलास कॉलनी चौकात गुरुवारी संध्याकाळी झालेल्या अंधाधुंद गोळीबाराने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. जुन्या वैमनस्यातून आणि खंडणीच्या वादातून हा हल्ला झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून, या घटनेत दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला तर त्यांचा काका गंभीर जखमी झाला आहे.

मृतांची ओळख अनिल हरकेश चौहान (२२) आणि त्याचा धाकटा भाऊ अमन हरकेश चौहान (१७) अशी झाली आहे. तर त्यांचा काका अर्जुन सूरजबली चौहान (२६) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेसातच्या सुमारास १० ते १२ जण कार आणि दुचाकींवरून घटनास्थळी आले आणि त्यांनी भररस्त्यात गोळीबार सुरू केला. या प्रकरणात सागर पाटील याचे नाव मुख्य आरोपी म्हणून समोर आले आहे.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, भर गर्दीत झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. नागरिक आणि दुकानदारांनी जीव वाचवण्यासाठी पळापळ केली. अनेक फेऱ्या झाडण्यात आल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना सेंट्रल रुग्णालयात हलवले. मात्र अमन चौहान याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, गोळी लागल्यानंतर अमन स्वतः त्याच्याकडे आला आणि गोळीबार झाल्याची माहिती दिली. “आम्ही त्याला प्रथम खासगी बालाजी रुग्णालयात नेले, पण तेथे सर्जन उपलब्ध नसल्याने ऑटो रिक्षाने सेंट्रल रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला,” असे त्याने सांगितले.

प्राथमिक तपासात चौहान कुटुंब आणि अंबरनाथ गाव परिसरातील काही गुन्हेगारांमध्ये जुना वाद असल्याचे समोर आले आहे.

मृत अनिलचा मोठा भाऊ विक्की चौहान याने आरोप केला की, सागर पाटील, बलविंदर बिराजदार आणि शेखर बिराजदार हे अनिलकडून दरमहा ‘हफ्ता’ मागत होते. “माझा भाऊ टेम्पो चालक म्हणून काम करत होता. अंबरनाथ गावात टेम्पो चालवण्यासाठी त्याच्याकडे पैसे मागण्यात आले. त्याने नकार दिल्यानंतर त्याला धमक्या दिल्या गेल्या,” असा दावा विक्कीने केला.

त्याने पुढे सांगितले की, अनिलने याप्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात एनसी दाखल केली होती. त्यानंतर आरोपींनी त्याच्यावर मारहाण केली. “नंतर त्याने एफआयआर दाखल केला, पण पोलिसांनी कठोर कारवाई केली नाही. आरोपींना जामीन मिळाला आणि ते सातत्याने धमक्या देत राहिले. पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर माझा भाऊ आज जिवंत असता,” असा आरोप त्याने केला.

कुटुंबीयांनी असा दावा केला की, या हल्ल्यातील काही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच त्यांना राजकीय पाठबळ असल्याने त्यांच्यावर पूर्वी कठोर कारवाई झाली नाही, असा आरोपही करण्यात आला आहे.

घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि हिल लाईन पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसर सील करून फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणात खंडणीच्या अँगलने तपास सुरू आहे. “प्राथमिक चौकशीत आरोपींनी मृताकडे हफ्त्याची मागणी केल्याचे समोर आले आहे. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर गोळीबार झाला असावा. पुढील तपास सुरू आहे,” असे त्यांनी सांगितले.

या दुहेरी हत्याकांडामुळे उल्हासनगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

Related to this topic: