Breaking News
  • वाढत्या पेट्रोल दरांचा परिणाम? पेट्रोल चोरीच्या घटनांत वाढ
  • पश्चिम नागपुरात वारंवारच्या लोडशेडिंगने विरोधात कॉंग्रेसकडून मुख्य विद्युत भवन कार्यालयात जोरदार आंदोलन
  • पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथे महिलेचा धारधार शास्त्राने वार करून खून
  • इंदापूर तालुक्यातील प्रश्न पेटला, कृषिमंत्री निघून गेल्यानंतरही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच
  • नंदुरबार बाजार पेठेत गवारची आवक वाढल्याने गवारचे दर अचानक घसरले
  • कल्याणच्या दुर्गाडी मंदिर प्रवेशबंदीच्या मुद्द्यावर कल्याणमध्ये राजकारण तापले
  • शिवसेनेचा पुणे महानगरपालिकेवर हल्लाबोल मोर्चा
  • नीट पेपरफुटी प्रकरण; पुण्यातील आणखी प्राध्यापक सीबीआयच्या रडारवर?
  • नाणेघाटावर धुक्याची पांढरी चादर; इंद्रवज्र पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

होम > आपले शहर > मराठवाडा > नांदेड

योग शिबिर

लठ्ठपणा निवारण्यासाठी योग काळाची गरज; २१ दिवसीय योग शिबिराचा समारोप

Yoga camp: नांदेडमधील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व स्वामी विवेकानंद योग सेंटरने आयोजित लठ्ठपणा कमी करण्यासाठी २१ दिवसीय योग शिबिराचा उत्साहात समारोप झाला.


लठ्ठपणा निवारण्यासाठी योग काळाची गरज २१ दिवसीय योग शिबिराचा समारोप

Yoga camp |

नांदेड (Yoga camp) : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व स्वामी विवेकानंद योग सेंटर, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'लठ्ठपणा निवारण्यासाठी योग' या विषयावरील २१ दिवशीय नि:शुल्क योग शिबिराचा नुकताच उत्साहात समारोप झाला. आधुनिक जीवनशैलीत योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या समारोपीय कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय योगपटू सोपानराव काळे उपस्थित होते, तर विशेष अतिथी म्हणून आयुष मंत्रालय प्रमाणित योग शिक्षक राघव दंडे यांनी मार्गदर्शन केले. मुख्य योग शिक्षिका अर्चना तोटावाड यांनी सर्व साधकांचे स्वागत करून आभार मानले.

या २१ दिवसांच्या शिबिरात (Yoga camp) साधकांना लठ्ठपणा कमी करण्यासाठी आवश्यक सूक्ष्म क्रिया, बैठक स्थितीतील आसने, पाठीवरील व पोटावरील आसने, विविध प्राणायाम, बंध व मुद्रा यांचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले. तसेच यौगिक जॉगिंग, सूर्य नमस्कार व ध्यानाचे विशेष सत्र घेण्यात आले. शिबिराबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना अरुण पाटील, वीरभद्र धोंडगे, राम भुसेवाड, संभाजी धुमाळ, रामराव भोसले, सुरेखा भोसीकर व मीरा स्वामी यांनी सांगितले की, वजन कमी करण्यासाठी हे शिबीर अत्यंत उपयुक्त ठरले आहे. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी लक्ष्मण परडे, विजय गोविंदवाड, लता काळे व मीना कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related to this topic: