Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > आपले शहर > विदर्भ > नागपूर

आ. समीर मेघे यांच्या जनता दरबारात समस्यांचा पाऊस; कार्यवाहीचे आश्वासन

हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर मेघे यांनी बुटीबोरी येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी १४ मे रोजी माजी नगराध्यक्ष बबलू गौतम यांच्या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार आयोजित केला.


आ समीर मेघे यांच्या जनता दरबारात समस्यांचा पाऊस कार्यवाहीचे आश्वासन

Janata Darbar |

नागपूर (Janata Darbar) : हिंगणा विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर मेघे यांनी बुटीबोरी येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी १४ मे रोजी माजी नगराध्यक्ष बबलू गौतम यांच्या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार आयोजित केला. या दरबारात विविध समस्यांचा पाऊस पडत नागरिकांनी आपल्या अडचणी मांडल्या.

यावेळी नगरपरिषदेचे आरोग्य सभापती अमजद शेख, नगरसेवक सन्नी चौहान, नगरसेविका जयश्री विनोद पाटील, करिश्मा संजय भुमरकर तसेच आई बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे सदस्य आयफाज शेख, शुभम कैकाडी आदींनी जनहिताच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

जनता दरबारात प्रभागातील रस्ते, नाली, स्वच्छता यांसाठी निधी उपलब्ध करून देणे, रेल्वे अतिक्रमणग्रस्तांचे पुनर्वसन, अंडरपास किंवा अंडरब्रिजची उभारणी, हनुमान नगरमधील रहिवाशांना मालकी हक्काचे पट्टे देणे, नियमित पाणीपुरवठा करणे, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करणे तसेच आवश्यक ठिकाणी डीपी बसविणे, गॅस सिलेंडरचा वेळेवर पुरवठा सुनिश्चित करणे अशा विविध मागण्या करण्यात आल्या.

नागरिकांनी शासनाच्या योजनांचा लाभ लवकरात लवकर मिळावा यासाठी संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

आमदार समीर मेघे यांनी नागरिकांच्या सर्व समस्या ऐकून त्यावर सकारात्मक कार्यवाही करून न्याय देण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या जनसंपर्क आणि समस्यांप्रती असलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले.

Related to this topic: