Breaking News
  • वाढत्या पेट्रोल दरांचा परिणाम? पेट्रोल चोरीच्या घटनांत वाढ
  • पश्चिम नागपुरात वारंवारच्या लोडशेडिंगने विरोधात कॉंग्रेसकडून मुख्य विद्युत भवन कार्यालयात जोरदार आंदोलन
  • पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथे महिलेचा धारधार शास्त्राने वार करून खून
  • इंदापूर तालुक्यातील प्रश्न पेटला, कृषिमंत्री निघून गेल्यानंतरही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच
  • नंदुरबार बाजार पेठेत गवारची आवक वाढल्याने गवारचे दर अचानक घसरले
  • कल्याणच्या दुर्गाडी मंदिर प्रवेशबंदीच्या मुद्द्यावर कल्याणमध्ये राजकारण तापले
  • शिवसेनेचा पुणे महानगरपालिकेवर हल्लाबोल मोर्चा
  • नीट पेपरफुटी प्रकरण; पुण्यातील आणखी प्राध्यापक सीबीआयच्या रडारवर?
  • नाणेघाटावर धुक्याची पांढरी चादर; इंद्रवज्र पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

अकोल्यात नगररचना विभागाची गैरसोय

अकोला नगररचना विभागावर गंभीर आरोप; नदी-नाल्यांवर अवैध बांधकाम

अकोल्यातील नगररचना विभागाच्या कारभारावर नागरिकांनी गंभीर आरोप केला आहे. नदी-नाल्यांवर अवैध बांधकामामुळे पूरस्थितीचा धोका वाढला आहे.


अकोला नगररचना विभागावर गंभीर आरोप नदी-नाल्यांवर अवैध बांधकाम

अकोला: शहरातील नगररचना विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रकार समोर आला आहे. प्रभाग क्रमांक १९ मधील जुने खेतान, कौलखेड परिसरात एका नामांकित बिल्डरने थेट नाल्यावरच टोलेजंग अपार्टमेंट उभारल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या घटनेमुळे प्रशासनाच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला जात असून, “पैसे द्या आणि काहीही करा” अशीच भूमिका नगररचना विभागाची असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

 नगररचना विभागाच्या भूमिकेवर संशय
शहरात वाढत्या अनधिकृत बांधकामांमुळे नागरिक आधीच त्रस्त आहेत. मात्र, आता नदी-नाल्यांवर अतिक्रमण करून बांधकामे उभी राहत असल्याने पर्यावरण आणि सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. एवढा मोठा प्रकल्प उभा राहत असताना नगररचना विभागाला याची कल्पना नव्हती का, असा सवाल उपस्थित होत आहे.

 नागरिकांचा संताप; चौकशीची मागणी
स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित बिल्डर आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
“नियम फक्त सामान्यांसाठी आणि सवलती बिल्डरांसाठी का?” असा संतप्त प्रश्न नागरिक विचारत आहेत.

पूरस्थितीची भीती
नदी-नाल्यांवर अतिक्रमण केल्यामुळे पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. भविष्यात जर पूर आला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

‘वरदहस्त’ बिल्डरांना मोकळीक?
सर्वसामान्य नागरिकांना घर बांधण्यासाठी परवानगी मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, काही ‘वरदहस्त’ बिल्डरांना नियम धाब्यावर बसवून थेट बांधकाम सुरू करण्याची मोकळीक दिली जात असल्याची चर्चा रंगली आहे. यामागे आर्थिक व्यवहार आणि राजकीय संरक्षण असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

 कारवाई होणार का?
हा प्रकार केवळ अकोल्यापुरता मर्यादित नसून, राज्यातील इतर शहरांमध्येही अशा प्रकारचे गैरप्रकार सुरू असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासनाने तात्काळ हस्तक्षेप करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Related to this topic: