Breaking News
  • अमेरिका-इराण तणाव: अणुशस्त्रांचा वापर कधीही समर्थनीय नाही- राहुल गांधी
  • गौतम अदानी यांचे 2030 पर्यंत 1 अब्ज टन मालवाहतुकीचे लक्ष्य
  • वैभव सूर्यवंशीची अप्रतिम कामगिरी; बाजारमूल्य 1 कोटीवरून 16 कोटी !
  • इराण-अमेरिका संघर्षात तात्पुरता ब्रेक; दोन आठवड्यांसाठी युद्धविराम
  • स्थलांतरित कामगारांना मोठा दिलासा; आता कनेक्शनशिवाय मिळणार लहान सिलेंडर
  • 'महिलांसाठी 2,000 रुपये आणि शेतकऱ्यांसाठी 15,000 रुपये'
  • दमानिया–अंधारे वाद तापला; ! CDR कुठून आले यावरून आरोप-प्रत्यारोप
  • मदरसे, औरंगजेब कबर आणि शस्त्रांवर टी. राजा सिंहांचे खळबळजनक वक्तव्य
  • पंचतारांकित हॉटेल बनलं ‘हवाला हब’? खरात प्रकरणाला दुबई कनेक्शनचा धक्का

होम > आपले शहर > विदर्भ > अकोला

अकोला सभागृह गोंधळ

अकोला सभागृहात गोंधळ प्रकरणी 16 नगरसेवक निलंबित

अकोला महानगरपालिकेच्या सभेत गोंधळानंतर 16 नगरसेवक निलंबित; विरोधकांचा आंदोलनाचा इशारा जारी, राजकीय तणाव वाढला.


अकोला सभागृहात गोंधळ प्रकरणी 16 नगरसेवक निलंबित

‘५० खोके एकदम ओके’ घोषणेमुळे सभागृह दणाणले
निलंबन मागे न घेतल्यास विरोधकांचा आंदोलनाचा इशारा


अकोला : महानगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत झालेल्या गदारोळानंतर निलंबित करण्यात आलेल्या १६ नगरसेवकांच्या निलंबनावर माघार घेण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती पुढे आली आहे. या घडामोडींमुळे सत्ताधारी व विरोधकांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

३० मार्च रोजी झालेल्या सभेत शहराच्या अर्थसंकल्पावर चर्चा अपेक्षित होती. मात्र, सुरुवातीलाच ‘५० खोके एकदम ओके’ या घोषणेमुळे वातावरण तापले. घोषणाबाजी वाढत गेल्याने सभागृहात मोठा गोंधळ निर्माण झाला आणि सत्ताधारी व विरोधक आमनेसामने आले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांना पाचारण करावे लागले.

गोंधळ शांत न झाल्याने महापौर शारदा खेडकर यांनी कठोर भूमिका घेत विरोधी गटातील १६ नगरसेवकांना तीन सभांसाठी निलंबित करण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयानंतर विरोधक अधिक आक्रमक झाले आणि महापौरांसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. परिणामी, सभेचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आणि शहराच्या विकासासाठी महत्त्वाचा असलेला अर्थसंकल्प चर्चेविना राहिला.

दरम्यान, निलंबनाचा निर्णय मागे घेण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत असून, याबाबत राजकीय हालचालींना वेग आला आहे. विरोधी गटाने निलंबन मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

या संपूर्ण प्रकारामुळे अकोल्यातील राजकीय वातावरण तापले असून, विकासाच्या मुद्द्यांऐवजी राजकीय संघर्षाला प्राधान्य दिले जात असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. आगामी सभांमध्ये हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related to this topic: