Breaking News
  • आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घोड्यावर बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला
  • धक्कादायक! बुलढाण्यात सिलेंडरचा स्फोट झाल्यानं घराला भीषण आग, 85 वर्षीय वृद्धेचा मृत्यू
  • भिवंडीत तरुणाचा साप गळ्यात घालून स्टंट; व्हिडिओ व्हायरल
  • भाजपचे शहराध्यक्ष नितीन धांडे आमदार व्हावे यासाठी साकडे घालणार- नवनीत राणा
  • नागपूरच्या धरमपेठ परिसरात मध्यरात्री वादातून 20 वर्षीय अभियांत्रिकी विद्यार्थ्याची चाकूने हत्या करण्यात आली. आरोपी अल्पवयीन असल्याचे समोर आले असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
  • पेपर लीकनंतर सरकारने NEET परीक्षा रद्द केली!
  • NEET UG 2026 परीक्षा रद्द; प्रकरणाची चौकशी CBI कडून होणार
  • आता नेपाळ जाण्यासाठी 'विशेष ओळखपत्र' दाखवणे अनिवार्य
  • रोहित आणि कोहली MS धोनीच्या खास क्लबमध्ये दाखल!

होम > संपादकीय > अग्रलेख

तामिळनाडूत क्रांती...!


तामिळनाडूत क्रांती

गेल्या सहा दशकांपासून तामिळनाडूत द्रमुक चळवळीशी संंबंधित पक्षाचीच सत्ता राहत आली आहे. कधी द्रमुक तर कधी अण्णाद्रमुक पक्ष आलटून पालटून सत्तेत राहिले. या सहा दशकांच्या द्रमुक वाटचालीला खंडित करीत यावेळी अभिनेता थलपती विजय यांच्या 'टीव्हीके' पक्षाने तामिळनाडूत आपला झेंडा रोवला आहे. अवघ्या दीड वर्षांपूर्वी राजकारणात प्रवेश केलेल्या विजयने आपल्या झंझावाती प्रचारातून तामिळनाडूत एकप्रकारची क्रांतीच घडवून आणली. विजय यांंच्या प्रचारसभांना मोठी गर्दी होत होती, त्यांच्या रॅलीतही खूप गर्दी दिसायची; परंतु त्यानंतरही त्यांचा पक्ष द्रमुक पक्षांची तामिळनाडूच्या राजकारणावरील पकड सैल करू शकेल असे वाटत नव्हते. एखाद-दोन संस्थांचा अपवाद वगळता इतर कोणत्याही सर्व्हेक्षण संस्थेने आपल्या मतदानोत्तर निकषात 'टीव्हीके'ला फारशा जागा दिल्या नव्हत्या; परंतु थलपती विजयने सगळे अंदाज धुळीस मिळवत मोठा विजय प्राप्त केला. 'इंडिया' आघाडीत काँग्रेसनंतर द्रमुक आणि तृणमूल हेच दोन मुख्य आधार पक्ष होते; परंतु या निवडणुकीत या दोन्ही पक्षांना मोठा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे काँग्रेसला केरळमध्ये सत्ता स्थापन करण्याची संधी मिळूनही 'इंडिया' आघाडीची ताकद वाढली, असे म्हणता येणार नाही. केरळमध्ये लागोपाठ दोन वेळा एकच आघाडी निवडून येत नाही हा इतिहास होता. त्याला मागच्या वेळी डाव्या आघाडीने छेद दिला खरा; परंतु लागोपाठ तिसर्‍यांदा एकच आघाडी निवडून येण्याचा विक्रम अशक्यप्राय होता. त्यामुळे यावेळी केरळमध्ये काँग्रेसप्रणीत आघाडी विजयी होणार हे आधीपासूनच स्पष्ट होते. केरळमधील पराभवाने डाव्यांच्या हाती असलेले शेवटचे राज्यही गेले. त्यामुळे सध्या तरी भारताचे राजकारण 'डावेमुक्त' झाल्याचे दिसते. आसाम, पुद्दुचेरीत भाजप सत्ता राखणार हेही अपेक्षितच होते. चमत्कार झाला तो तामिळनाडूत आणि धक्का बसला तो प.बंगालमध्ये.

Related to this topic: