Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > महाराष्ट्र

चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली विधान परिषदेत अरुण लखानींचा बिनविरोध विजय

महायुतीच्या नेत्यांकडून महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घ्यावी, असे आवाहन सातत्याने करण्यात येत होते.


चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली विधान परिषदेत अरुण लखानींचा बिनविरोध विजय

Unopposed Election |

(Unopposed Election) महायुतीच्या नेत्यांकडून महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घ्यावी, असे आवाहन सातत्याने करण्यात येत होते. अशातच चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड घडली आहे. काँग्रेसचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून, त्यानंतर भाजपाचे उमेदवार अरुण लखानी यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला आहे.

उमेदवारी मागे घेतल्यानंतर शैलेश अग्रवाल यांनी काँग्रेसमधील काही स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप केले. निवडणुकीदरम्यान काँग्रेसमधील काही नेत्यांनी भाजप उमेदवाराला मदत केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच भाजपाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ पैसे वाटप करण्याचे कामही काँग्रेसमधील काही नेत्यांनी केल्याचा दावा त्यांनी केला आहे.

पक्षांतर्गत गटबाजी, संख्याबळाचा अभाव आणि काही स्थानिक नेत्यांच्या भूमिकेमुळे उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. त्यांच्या या आरोपांमुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद आणि मतभेद पुन्हा एकदा उघडकीस आले असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुधीर कोठारी यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे निवडणुकीतील प्रमुख प्रतिस्पर्धी मैदानाबाहेर गेल्याने भाजपाचे अरुण लखानी यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी दोन्ही प्रमुख उमेदवारांनी माघार घेतल्याने या मतदारसंघात मतदानाची गरज उरली नाही. परिणामी निवडणूक अधिकाऱ्यांनी अरुण लखानी यांना बिनविरोध विजयी घोषित केले.

अरुण लखानी यांच्या बिनविरोध निवडीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे, काँग्रेसमधील कथित अंतर्गत कलह आणि अग्रवाल यांनी केलेल्या आरोपांमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या विजयामुळे विधान परिषदेत भाजपाला आणखी एक प्रतिनिधित्व मिळाले आहे.

 

Related to this topic: