Breaking News
  • Pune: पुण्यात महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे 66 वे वार्षिक अधिवेशन
  • Pune: पुण्यात पार पडली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक
  • Amravati: जिल्हा रुग्णालयात ३ बाळांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दु:ख
  • मराठी भाषेचा ज्ञानवृक्ष कोसळला, डॉ. यास्मिन शेख यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी वाहिली श्रद्धंजली
  • यवतमाळ एसटी आगरात खड्ड्यांमुळे चालक वाहक त्रस्त
  • लोणी येथील शेतकऱ्यांचे सोयाबीन बियाणं उगवलेच नाही
  • गडचिरोली जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले, शेतकरी सुखावला तर जनजीवन विस्कळीत
  • २९ ऑगस्टपासून मुंबईत उपोषण करणार - जरांगेंचा इशारा, शिष्टमंडळ भेटीला
  • गडचिरोलीत मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका पुरात अडकली

होम > महाराष्ट्र

Maharashtra Weather

Maharashtra Weather Update: राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; पुणे-सातारा घाटमाथ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा वेग तुलनेने कमी झालेला असला, तरी आता पुन्हा पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.


maharashtra weather update राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार पुणे-सातारा घाटमाथ्यासह या जिल्ह्यांना येलो अलर्ट

Maharashtra Weather |

मराठवाडा आणि पूर्व विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता; उत्तर भारतातील अनेक राज्यांनाही पावसाचा इशारा

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा वेग तुलनेने कमी झालेला असला, तरी आता पुन्हा पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. आज पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता असून, मराठवाडा आणि पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी विजांच्या कडकडाटासह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर आज मुसळधार ते जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्याचवेळी मराठवाड्यातील परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये तसेच पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाऊस सुरू असताना अनावश्यकपणे बाहेर न पडता सुरक्षित ठिकाणी राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील इतर भागांमध्ये बहुतांश वेळ ढगाळ वातावरण राहू शकते. काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, महाराष्ट्राबरोबरच देशाच्या विविध भागांमध्येही पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. उत्तर भारत, पश्चिम भारत आणि ईशान्य भारतात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने सोमवारी देशातील किमान १५ राज्यांमध्ये पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी ५० ते ६० किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

राजधानी दिल्लीमध्ये मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सध्या जाणवत असलेल्या उकाडा आणि दमट हवामानापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक जिल्ह्यांत हलक्या सरींपासून मुसळधार पावसापर्यंतची स्थिती निर्माण होऊ शकते. या भागात जोरदार वारेही वाहण्याची शक्यता आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशातील काही भागांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

याशिवाय उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसासह अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरच्या उंचावरील भागांमध्ये देखील पाऊस पडण्याचा अंदाज आहे. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी हवामान विभागाकडून जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related to this topic: