राज्यातील पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता असून, मुंबई वेधशाळेने पुढील चार दिवसांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
मुंबई : राज्यातील पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता असून, मुंबई वेधशाळेने पुढील चार दिवसांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. जुलैअखेरपर्यंत विशेषतः विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा भागात पावसाचा प्रभाव वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिक आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
विदर्भात ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाच्या अंदाजानुसार २९ जुलै रोजी गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच ३० जुलै रोजी चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट कायम राहणार आहे. या कालावधीत विजांच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज
२८ ते ३१ जुलै या कालावधीत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापूर घाट परिसरासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन पर्यटक आणि स्थानिकांनी घाटमार्गावरील प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी, असे प्रशासनाने सांगितले आहे.
२८ जुलै २०२६
यलो अलर्ट: रायगड, जळगाव, पुणे घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, छ. संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली.
२९ जुलै २०२६
ऑरेंज अलर्ट: गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली.
यलो अलर्ट: नाशिक, नाशिक घाट, जळगाव, छ. संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, कोल्हापूर घाट, रत्नागिरी, सातारा घाट, रायगड, पुणे घाट आणि सिंधुदुर्ग.
३० जुलै २०२६
ऑरेंज अलर्ट: चंद्रपूर.
यलो अलर्ट: रायगड, पुणे घाट, सातारा घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली.
३१ जुलै २०२६
यलो अलर्ट: रायगड, पुणे घाट, सातारा घाट, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, वर्धा आणि यवतमाळ.