Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > महाराष्ट्र

महाराष्ट्र मान्सून अलर्ट

महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट? ऑगस्ट सर्वात कोरडा महिना; सप्टेंबरमध्ये तरी पाऊस पडणार का?

Maharashtra Monsoon Update: जुलैमध्ये मुसळधार पावसाने मुंबईला झोडपून काढल्यानंतर ऑगस्टमध्ये मात्र पावसाचा जोर अचानक कमी झाला. गेल्या दहा वर्षांतील ऑगस्ट महिन्याच्या पावसाची आकडेवारी पाहता ऑगस्ट कोरडा.


महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट ऑगस्ट सर्वात कोरडा महिना सप्टेंबरमध्ये तरी पाऊस पडणार का 

Maharashtra Monsoon |

 

जुलैच्या मुसळधार पावसानंतर ऑगस्टमध्ये पावसाचा जोर मंदावला
पुढील काही दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज

मुंबई (Maharashtra Monsoon Update) : यंदाच्या पावसाळ्यात मुंबईत आतापर्यंत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असला, तरी ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. जुलैमध्ये मुसळधार पावसाने मुंबईला झोडपून काढल्यानंतर ऑगस्टमध्ये मात्र पावसाचा जोर अचानक कमी झाला. गेल्या दहा वर्षांतील ऑगस्ट महिन्याच्या पावसाची आकडेवारी पाहता, यंदाचा ऑगस्ट हा पावसाच्या तुटीच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकाचा महिना ठरला आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस मुंबईसह कोकणात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र, मुंबईत सध्या तरी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

ऑगस्टमध्ये पावसाची मोठी तूट

यंदा मुंबईत मोसमी पावसाचे (Maharashtra Monsoon) आगमन नेहमीपेक्षा तब्बल 13 दिवस उशिराने झाले. त्यामुळे जूनमध्ये पावसाची मोठी कमतरता निर्माण झाली होती. त्यानंतर जुलैमध्ये परिस्थितीत मोठा बदल झाला. उत्तर कोकणात मुसळधार पाऊस झाला, तर मुंबईतही सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. जुलैच्या पहिल्या पाच दिवसांतच कुलाबा येथे संपूर्ण महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत 12 टक्के अधिक, तर सांताक्रूझ येथे 5 टक्के अधिक पाऊस नोंदवण्यात आला होता. मात्र, ऑगस्टमध्ये पावसाची ही लय कायम राहिली नाही. सक्रिय हवामान प्रणालींचा अभाव असल्याने मुंबईत केवळ तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

संपूर्ण मोसमी हंगामात मुंबईत सरासरीपेक्षा अधिक पाऊस

ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारली असली तरी 1 जून ते 31 ऑगस्ट या संपूर्ण मोसमी कालावधीचा विचार करता मुंबईत आतापर्यंत सरासरीपेक्षा अधिक (Maharashtra Monsoon) पाऊस झाला आहे. या कालावधीत सांताक्रूझ केंद्रावर सुमारे 2,216 मिमी, तर कुलाबा केंद्रावर 1,766 मिमी पावसाची नोंद झाली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या हवामान प्रणालींचा प्रभाव पुढील काही दिवसांत महाराष्ट्रावर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणासह राज्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढू शकतो. मुंबईत पुढील चार ते पाच दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांवर दुष्काळाचे सावट

मुंबईतील पाणीसाठ्याची (Maharashtra Monsoon) स्थिती समाधानकारक असली, तरी राज्यातील अनेक भागांमध्ये परिस्थिती चिंताजनक आहे. मोसमी पावसाच्या दुसऱ्या टप्प्यातही विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट कायम आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच या भागांत पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. ऑगस्टमध्येही अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे अनेक जिल्ह्यांतील पावसाची तूट आणखी वाढली आहे. राज्यातील काही भागांत पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये तरी चांगला पाऊस होणार का, याकडे शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

सप्टेंबरमध्ये पावसाची तूट भरून निघणार?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सप्टेंबरच्या सुरुवातीला राज्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. बुधवारी आणि गुरुवारी (Maharashtra Monsoon) विदर्भातील अनेक भागांसह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकणातही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मात्र, संपूर्ण राज्यात व्यापक आणि सातत्यपूर्ण पाऊस झाल्याशिवाय सध्याची पावसाची तूट भरून काढणे कठीण असल्याचे हवामान अभ्यासकांचे मत आहे. सप्टेंबरमध्ये पावसाचा जोर वाढल्यास ऑगस्टच्या तुलनेत राज्याला काहीसा दिलासा मिळू शकतो.

 

Related to this topic: