Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > महाराष्ट्र

Maharashtra Farmer Loan Waiver

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! १६.९४ लाख पात्र लाभार्थ्यांच्या पीक कर्ज खात्यात ४ ऑगस्टला ७ हजार कोटी जमा होणार

राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घडामोड समोर आली आहे.


शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा १६९४ लाख पात्र लाभार्थ्यांच्या पीक कर्ज खात्यात ४ ऑगस्टला ७ हजार कोटी जमा होणार

Maharashtra Farmer Loan Waiver |

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या पात्र शेतकऱ्यांना डीबीटीद्वारे लाभ; ९४ हजार प्राप्तिकरदाते शेतकरी अपात्र

राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घडामोड समोर आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात येत्या ४ ऑगस्ट (मंगळवार) रोजी एकाच टप्प्यात सुमारे ७ हजार कोटी रुपये जमा करण्यात येणार आहेत. या प्रक्रियेमुळे १६ लाख ९४ हजार पात्र शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार असल्याची माहिती सहकार विभागातील सूत्रांनी दिली आहे.

राज्य सरकारच्या या योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात सहकार विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, उर्वरित पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने रक्कम जमा केली जाणार आहे. मात्र, यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. कर्जमाफीची रक्कम पीक कर्ज खात्यात जमा झाल्यानंतर या शेतकऱ्यांना पुन्हा पीक कर्ज घेण्याचा मार्गही खुला होणार आहे.

या योजनेनुसार ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. तसेच नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहन निधीची तरतूद करण्यात आली आहे.

याशिवाय, २ लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठीही एकवेळ समझोता (One Time Settlement) योजना लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत संबंधित शेतकऱ्यांनी २ लाख रुपयांवरील उर्वरित थकबाकी बँकेत जमा केल्यानंतर सरकार त्यांच्या कर्ज खात्यात २ लाख रुपये जमा करणार आहे.

योजनेच्या पहिल्या टप्प्यात २ लाख रुपयांच्या मर्यादेतील कर्जदार शेतकऱ्यांची यादी छाननीसाठी प्राप्तिकर विभागाकडे पाठविण्यात आली होती. या पडताळणीत ९४ हजार शेतकरी अपात्र ठरले असून त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. उर्वरित १६ लाख ९४ हजार पात्र शेतकरी यांची अंतिम यादी निश्चित करण्यात आली आहे. या लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केल्यानंतर त्यांच्या पीक कर्ज खात्यात नियोजित रक्कम जमा केली जाणार आहे.

Related to this topic: