Deool Band 2: शेतकर्यांच्या आत्महत्यांना आळा बसावा, या हेतूने निर्माण केलेला 'देऊळ बंद-2' हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघावा, असे आवाहन या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे, निर्माते कैलास वाणी
'देऊळ बंद-2' चित्रपट आवर्जून बघा: प्रवीण तरडे
'देऊळ बंद-2' या चित्रपटाला शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांच्या शुभेच्छा
नागपूर (Deool Band 2) : शेतकर्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. कर्जबाजारीपणा, मुलांच्या शिक्षणाची व दररोजच्या उदरनिर्वाहाची चिंता, यामुळे शेतकरी आत्महत्या करतो. परंतु, आत्महत्येमुळे समस्या सुटत नाही. शेतकर्यांच्या आत्महत्यांना आळा बसावा, या हेतूने निर्माण केलेला 'देऊळ बंद-2' हा (Deool Band 2) चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघावा, असे आवाहन या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde), निर्माते कैलास वाणी (Kailas Vani) यांनी आज बुधवारी दैनिक देशोन्नतीला दिलेल्या सदिच्छा भेटीत केले.
सर्वप्रथम दैनिक देशोन्नतीचे मुख्य संपादक व शेतकरी नेते प्रकाश पोहरे (Prakash Pohare) यांनी लेखक-दिग्दर्शक व निर्मात्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर या (Deool Band 2) चित्रपटाविषयी सविस्तर चर्चा केली. हा चित्रपट नक्की बघेल व त्यानंतर माझ्या भावना कळवेल, असे मत प्रकाश पोहरे यांनी व्यक्त करून या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. तसेच शेतकर्यांच्या समस्यांवर जास्तीत जास्त चित्रपट तयार व्हावेत, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे, या सदिच्छा भेटीदरम्यान देशोन्नती डिजिटलचे विभाग प्रमुख (Aniket Patil) अनिकेत पाटील यांनी या (Deool Band 2) संपूर्ण चित्रपट चमूची एक विशेष आणि सविस्तर मुलाखत घेतली. ज्यामध्ये चित्रपटाचा रंजक प्रवास आणि अनेक महत्त्वाच्या पैलूंवर मनमोकळी चर्चा करण्यात आली. याप्रसंगी चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde), निर्माते कैलास वाणी (Kailas Vani), नागपूरचे अभिनेते मुकुंद वसुले व साऊंड डिझायनर संकेत घोटकर, अनुप गोरे प्रामुख्याने उपस्थित होते.

देऊळ बंद-2:
आत्महत्या केल्याने शेतकर्यांचे प्रश्न सुटत नाही. शेतकर्यांच्या विचारांत बदल करण्याची गरज आहे. असा संदेश या (Deool Band 2) चित्रपटातून दिला आहे. या चित्रपटात स्वामी समर्थ शेतकरी महिलेसोबत, शेतात, दर्याखोर्यामध्ये, एसटीने प्रवास करून तिचे समुपदेशन करतात. मोहन जोशी यांनी स्वामी समर्थ यांची भूमिका साकारली आहे. तर प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनी बोगस बियाणे विक्रेत्याची भूमिका साकारली आहे. बियाणे खरेदी करताना शेतकरी कसे फसवले जातात, याचे उत्तम उदाहरण या चित्रपटात बघावयास मिळते.
तुकाराम (मंगेश देसाई) हा एक गरीब शेतकरी आहे. तो स्वामी समर्थाचा निस्सीम भक्त आहे. मात्र परिस्थितीमुळे तो हतबल होतो आणि हताश होऊन देवळाला कुलूप लावून निघून जातो. तुकारामाची पत्नी संगीता (स्नेहल तरडे) नास्तिक बनलेली महिला आहे. आपल्या कुटुंबाला आणि शेतकर्याना होणारा त्रास पाहून ती थेट देवळाच्या (स्वामी समर्थांच्या) अस्तित्वावरच प्रश्न उपस्थित करते, अशी या चित्रपटाची कथा आहे.
कष्ट व कर्मावर विश्वास ठेवा:
मी माझ्या कर्मावर व कष्टावर विश्वास ठेवल्यानेच या (Deool Band 2) चित्रपटाला प्रचंड यश लाभत आहे, अशी भावना लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात व्यक्त केली. गेल्या वीस दिवसात या चित्रपटाने 70 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाच्या कमाईतील काही भाग हा शेतकर्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात येईल, अशी कबुली दिग्दर्शक प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांनी दिली. नागपूरचे अभिनेते मुकुंद वसुले यांनी या चित्रपटात गाडीवानाची छोटी भूमिका साकारली असल्याचे सांगितले. तर, शेतकर्यांच्या सर्व समस्यांची उत्तरे या चित्रपटात बघावयास मिळते, असे निर्माते कैलास वाणी (Kailas Vani) यांनी सांगितले.