Breaking News
  • कंगनाचा पुन्हा निशाणा; अभिजीत दिपकेंच्या इंग्रजीवर अप्रत्यक्ष टोला
  • फडणवीसांच्या दिल्लीवारीला नवा अर्थ? भाजपच्या संसदीय मंडळात मिळणार मोठी जबाबदारी?
  • पावसाचा जोर वाढणार! राज्यातील 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट; जाणून घ्या हवामानाचा अंदाज
  • सोन्याच्या दरात घसरण; २४ कॅरेट सोनं ₹२२० प्रति ग्रॅम स्वस्त, चांदीचे भाव स्थिर
  • राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची चर्चा; २९ ऑगस्टच्या बैठकीकडे महाराष्ट्राचे लक्ष
  • Pune: पुण्यात महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे 66 वे वार्षिक अधिवेशन
  • Pune: पुण्यात पार पडली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक
  • Amravati: जिल्हा रुग्णालयात ३ बाळांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दु:ख
  • मराठी भाषेचा ज्ञानवृक्ष कोसळला, डॉ. यास्मिन शेख यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी वाहिली श्रद्धंजली

होम > महाराष्ट्र

महाराष्ट्र दुहेरी दुष्काळ

महाराष्ट्रावर हवामान बदलाचे सावट; दुहेरी दुष्काळाचे संकट

Maharashtra Drought: काही तासांत मुसळधार पाऊस पडणे आणि त्यानंतर दीर्घकाळ पावसाचा खंड पडणे, हा नवा पॅटर्न महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत जाणवत आहे. हवामानबदलामुळे वातावरणाची आर्द्रता धारण...


महाराष्ट्रावर हवामान बदलाचे सावट दुहेरी दुष्काळाचे संकट 

Maharashtra Drought |

पावसाचे बदलते चक्र; काही तासांत अतिवृष्टी, तर आठवड्यांचे कोरडे दिवस

दीपक पं देशमुख
अकोला () :
भारतीय मान्सूनच्या स्वरूपात गेल्या काही दशकांत लक्षणीय बदल होत असून, एकूण पावसाचे प्रमाण कायम राहिले तरी त्याचे दिवस, वेळ, तीव्रता आणि भौगोलिक वितरण बदलत आहे. काही तासांत मुसळधार पाऊस पडणे आणि त्यानंतर दीर्घकाळ पावसाचा खंड पडणे, हा नवा पॅटर्न महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांत जाणवत आहे. हवामानबदलामुळे वातावरणाची आर्द्रता धारण करण्याची क्षमता वाढत असल्याने कमी कालावधीत (Maharashtra Drought) अधिक तीव्र पाऊस पडण्याची शक्यता वाढते. परिणामी एकाच हंगामात काही भागांत पूर, तर काही भागांत पाणीटंचाई अशी विरोधाभासी परिस्थिती निर्माण होत असल्याने राज्यावर दुष्काळाचे संकट घोंगावत आहे.

महाराष्ट्रातील यंदाची पर्जन्यस्थिती या (Maharashtra Drought) बदलाचे ठळक उदाहरण ठरत आहे. २४ ऑगस्टपर्यंतच्या उपलब्ध विभागनिहाय आकडेवारीनुसार, जून-जुलैमध्ये राज्यात सरासरीपेक्षा ४.३ टक्के अधिक पाऊस झाला; मात्र ऑगस्टमध्ये राज्याची पर्जन्यमानाची स्थिती केवळ ५२.७ टक्के सरासरी इतकी राहिली. त्यामुळे हंगामाच्या एकूण पावसाची तूट १०.७ टक्क्यांवर पोहोचली आहे.

महाराष्ट्रात विभागनिहाय मोठी तफावत

कोकण विभागात जूनपासून २5 ऑगस्टपर्यंत २३४०.८ मिमी पाऊस झाला असून, तो सरासरीच्या १००.९ टक्के आहे. मात्र नाशिक विभागात ४०८.२ मिमी म्हणजे ७९.९ टक्के, पुणे विभागात ५६९.८ मिमी म्हणजे ७९.४ टक्के, छत्रपती संभाजीनगर विभागात ३६७.५ मिमी म्हणजे ७८.२ टक्के, अमरावती विभागात ४४८.९ मिमी म्हणजे ७९.२ टक्के, तर नागपूर विभागात ५८८.४ मिमी म्हणजे ७१.९ टक्के पाऊस झाला आहे.

शेती, पाणी आणि शहरांसमोर नवे आव्हान

पावसाच्या या (Maharashtra Drought) अनियमिततेचा सर्वाधिक फटका शेतीला बसतो. पेरणीनंतर पावसाचा मोठा खंड पडल्यास पिकांची वाढ खुंटते; तर अल्पावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे मातीची धूप, पिकांचे नुकसान आणि जलमय स्थिती निर्माण होते. मराठवाड्यात ऑगस्टमधील दीर्घ कोरड्या कालावधीमुळे जलसाठे आणि खरीप पिकांबाबत चिंता वाढली आहे.

कधी, कुठे आणि किती तीव्रतेचा
हवामानबदलासोबत हिंदी महासागराचे वाढते तापमान, एल निनो-ला नीना यांसारख्या महासागरीय घटना आणि वातावरणातील बदलता प्रवाह मान्सून अधिक गुंतागुंतीचा बनवत आहेत. त्यामुळे भविष्यात ‘सरासरी पाऊस’ हा एकटाच पुरेसा मापदंड राहणार नाही; पाऊस कधी, कुठे आणि किती तीव्रतेने पडतो, हे अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.

Related to this topic: