Breaking News
  • राज्यात मान्सूनची संथ वाटचाल, हवामान विभागाचा शेतकऱ्यांना पेरणीत घाई न करण्याचा सल्ला
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १८ जणांवर कारवाई;९ हजारांचा दंड वसूल
  • शेगाव शहरात लाखो भाविकांच्या आरोग्याशी खेळ,भेसळयुक्त खाद्यपदार्थांची सर्रास विक्री
  • रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग पथका’कडून वर्षभरात ३ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल
  • आमच्या परिसरातील नळाला पाणी का सोडलं नाही...? असा जाब ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला विचारला असता, कर्मचाऱ्याने गावातील लोकांना जमवून गावातीलच पारधी वस्तीवर हल्ला करून जवळपास 11 घरांची तोडफोड केली
  • मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीतून गोकुळ गिते माघार घेणार असल्याची शक्यता आहे.
  • मुंबईतील गगनचुंबी टॉवर आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी एकच दर न ठेवता आता वेगवेगळा रेडीरेकनर दर आकारला जाणार आहे.
  • वाशिममध्ये शिवशाही बसचा अपघात, चालकाचे नियंत्रण सुटल्यानं घडला अनर्थ
  • हिंगोलीच्या कळमनुरी मध्ये गॅस एजन्सीच्या बाहेर ग्राहकांनी गोंधळ घातला आहे

होम > महाराष्ट्र

भोंदू अशोक खरात प्रकरणावर येणार मराठी सिनेमा? अभिनेत्री दीपाली सय्यद महत्त्वाच्या भूमिकेत

नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता.


भोंदू अशोक खरात प्रकरणावर येणार मराठी सिनेमा अभिनेत्री दीपाली सय्यद महत्त्वाच्या भूमिकेत 

Baba Scandal MOVIE |

मुंबई (Baba Scandal MOVIE) : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचे कथित शोषण, आक्षेपार्ह व्हिडीओ आणि राजकीय वर्तुळात झालेली खळबळ यामुळे हे प्रकरण राज्यभर चर्चेचा विषय ठरले. आता या गाजलेल्या प्रकरणावर आधारित मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा रंगली असून अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत दीपाली सय्यद झळकणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दीपाली सय्यद यांनी स्वतः या चित्रपटात भूमिका साकारणार असल्याची कबुली दिल्यानंतर या चर्चांना अधिक जोर मिळाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटात अशोक खरात याचा कथित ढोंगीपणा, महिलांची फसवणूक, अंधश्रद्धेच्या माध्यमातून केलेले गैरप्रकार तसेच या प्रकरणाशी संबंधित राजकीय आणि सामाजिक पैलूंवर प्रकाश टाकला जाणार आहे. त्यामुळे हा सिनेमा केवळ एका व्यक्तीच्या कथित कृत्यांपुरता मर्यादित न राहता राज्यातील सामाजिक वास्तव आणि राजकीय घडामोडींनाही स्पर्श करणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी मुलाखतीदरम्यान या चित्रपटाबाबत सविस्तर भाष्य केले. त्या म्हणाल्या, “भोंदू अशोक खरातबद्दल मला ‘बिग बॉस’मधून बाहेर आल्यानंतर माहिती मिळाली. त्यानंतर या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. या प्रकरणावर सिनेमा येत आहे, मात्र मी त्या चित्रपटाची निर्माती नाही. या सिनेमाचे निर्माते वेगळे आहेत. पण एक कलाकार म्हणून मी या चित्रपटात काम करत आहे.”

यावेळी त्यांनी समाजालाही इशारा देत, “अशा भोंदू बाबांपासून लोकांनी सावध राहिले पाहिजे. समाजात अशा प्रकारचे अनेक लोक लपून बसलेले असू शकतात. कोणत्याही बाबावर आंधळा विश्वास ठेवू नये,” असेही आवाहन केले.

दरम्यान, दीपाली सय्यद या नेमकी कोणती भूमिका साकारणार याबाबत त्यांनी स्पष्ट खुलासा टाळला. “आता सगळं सांगितलं तर सिनेमा पाहण्यात मजा काय राहील? माझ्याकडे स्क्रिप्ट आली आहे. ती पूर्ण वाचल्यानंतरच अंतिम निर्णय होईल. पुढील महिन्यापासून चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्याची शक्यता आहे,” असे त्यांनी सांगितले. मात्र, त्यांच्या वक्तव्यानंतर त्या रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.

अशोक खरात प्रकरण समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांच्या नावाचीही राजकीय आणि सोशल मीडियामध्ये मोठी चर्चा झाली होती. विरोधकांकडून विविध आरोप करण्यात आले होते. यावर बोलताना दीपाली सय्यद म्हणाल्या, “राजकारणात आरोप-प्रत्यारोप होतच असतात. मात्र या प्रकरणात नेमकं सत्य काय आहे, हे प्रेक्षकांना सिनेमा पाहिल्यानंतरच समजेल.”

दरम्यान, या चित्रपटाची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नसली तरी कथानक, कलाकार आणि विषयामुळे हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चर्चेचा विषय ठरत आहे. महाराष्ट्रात गाजलेल्या या प्रकरणावर आधारित चित्रपटात नेमकं काय दाखवलं जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related to this topic: