Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > शेती

परभणी शेत आग

परभणीत शेतातील आखाड्याला भीषण आग; दीड लाखांचे नुकसान

Parbhani farm fire: परभणीतील जिंतूर तालुक्यात सावरगाव तांडा येथे महिला शेतकरी संगीता राठोड यांच्या शेतातील आखाड्याला आग लागली. त्यात तीन स्प्रिंकलर सेट जळून खाक झाले व दीड लाख रुपयांचे नुकसान झाले.


परभणीत शेतातील आखाड्याला भीषण आग दीड लाखांचे नुकसान

Parbhani farm fire |

 

महिला शेतकरी संगीता राठोड यांचे तीन स्प्रिंकलर सेट जळून खाक

परभणी (Parbhani farm fire) : जिंतूर तालुक्यातील सावरगाव तांडा येथील गट क्रमांक १२७ मधील महिला शेतकरी संगीता संजय राठोड यांच्या शेतातील आखाड्याला सोमवार ११ मे रोजी दुपारी दीडच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत तीन स्प्रिंकलर सेट पूर्णपणे जळून खाक झाले असून आंबा व नारळाची काही झाडेदेखील आगीत भस्मसात झाली आहेत. या (Parbhani farm fire) घटनेत जवळपास दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार ११ मे रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने शेतातील साहित्य व झाडांचे मोठे नुकसान झाले. नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या (Parbhani farm fire) घटनेमुळे महिला शेतकरी संगीता राठोड यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. शासनाने पंचनामा करून तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी संगीता राठोड यांनी केली आहे.

Related to this topic: