Parbhani farm fire: परभणीतील जिंतूर तालुक्यात सावरगाव तांडा येथे महिला शेतकरी संगीता राठोड यांच्या शेतातील आखाड्याला आग लागली. त्यात तीन स्प्रिंकलर सेट जळून खाक झाले व दीड लाख रुपयांचे नुकसान झाले.
महिला शेतकरी संगीता राठोड यांचे तीन स्प्रिंकलर सेट जळून खाक
परभणी (Parbhani farm fire) : जिंतूर तालुक्यातील सावरगाव तांडा येथील गट क्रमांक १२७ मधील महिला शेतकरी संगीता संजय राठोड यांच्या शेतातील आखाड्याला सोमवार ११ मे रोजी दुपारी दीडच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत तीन स्प्रिंकलर सेट पूर्णपणे जळून खाक झाले असून आंबा व नारळाची काही झाडेदेखील आगीत भस्मसात झाली आहेत. या (Parbhani farm fire) घटनेत जवळपास दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार ११ मे रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्याने शेतातील साहित्य व झाडांचे मोठे नुकसान झाले. नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या (Parbhani farm fire) घटनेमुळे महिला शेतकरी संगीता राठोड यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. शासनाने पंचनामा करून तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी संगीता राठोड यांनी केली आहे.