Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > शेती

शेतकरी बेमुदत उपोषण

शिवरस्ता अडीच वर्षांपासून बंद; सरणावर बसून शेतकऱ्याचे बेमुदत उपोषण

Farmers Hunger Strike: शेतकऱ्यांनी शेत कामांसाठी अडतील बांधलेल्या रस्त्याखाली वर्षांपासून बंद असलेला शिवरस्ता खुलाव्याच्या मागणीसाठी सरण बांधून उपोषण करीत आहेत.


शिवरस्ता अडीच वर्षांपासून बंद सरणावर बसून शेतकऱ्याचे बेमुदत उपोषण

Farmers Hunger Strike |

भूम (Farmers Hunger Strike) : भूम तालुक्यातील सामनगाव–गणेगाव येथील अडीच वर्षांपासून बंद असलेला शिवरस्ता तातडीने खुला करण्याच्या मागणीसाठी गणेगाव येथील शेतकरी धन्यकुमार नारायण चव्हाण यांनी मंगळवार (दि. ७) पासून संबंधित रस्त्यावरच सरण रचून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मुसळधार पावसातही सुरू असलेल्या या आंदोलनामुळे परिसराचे लक्ष या प्रश्नाकडे वेधले गेले आहे.

उपोषणस्थळी लावण्यात आलेल्या बॅनरवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे. उपोषणकर्ते धन्यकुमार चव्हाण यांनी याप्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या निवेदनानुसार, सामनगाव–गणेगाव परिसरातील संबंधित शिवरस्ता गेल्या अडीच वर्षांपासून बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खरीप हंगाम सुरू असताना पेरणीसह अन्य कृषी कामांवर त्याचा विपरीत परिणाम होत असून शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

रस्ता खुला करण्यासाठी अनेक वेळा संबंधित प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या. (Farmers Hunger Strike) अधिकृत मोजणीची प्रक्रिया देखील पूर्ण झाली. मात्र, त्यानंतरही प्रत्यक्षात रस्ता मोकळा करण्याबाबत कोणतीही प्रभावी कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे शेतीची कामे ठप्प झाली असून अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे, सुरू असलेल्या पावसातही धन्यकुमार चव्हाण यांनी रस्त्यावरच सरण रचून बेमुदत उपोषण सुरू ठेवले आहे. उपोषण सुरू होऊन एक दिवस उलटूनही प्रशासनातील कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याने आंदोलनस्थळी भेट दिली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शिवरस्ता तातडीने खुला करून हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे. आता या आंदोलनावर प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सामनगाव–गणेगाव परिसरातील शेतकरी आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related to this topic: