Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > शेती

शेतकरी संघटना आंदोलन

जिंतूर-कनेरगाव नाक्यावर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे टायर जाळून रास्ता रोको आंदोलन

Farmers' Organization Protest: जिंतूर-कनेरगाव नाका महामार्गावर शेतकर्यांच्या नेत्यांनी टायर जाळून रस्ता रोकणारा आंदोलन सुरू. मागण्या вклюित: कर्जीमा, डेअपी खत पुरवठा, गाय गोठा अनुदान


जिंतूर-कनेरगाव नाक्यावर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे टायर जाळून रास्ता रोको आंदोलन  

Farmers' Organization Protest |

हिंगोली (Farmers' Organization Protest) : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने 11 जून रोजी जिंतूर-कनेरगाव नाका महामार्गावर टायर जाळून भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे तीन तास चाललेल्या या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.  
 
आंदोलकांनी सरसकट कर्जमाफी, डीएपी खताचा तात्काळ पुरवठा, विहीर व गाय गोठा अनुदानाची थकीत बिले अदा करणे आणि घरकुल लाभार्थ्यांचे रखडलेले हप्ते त्वरित जमा करणे या मागण्या लावून धरल्या. याशिवाय, KTL कंपनीने सेनगाव तहसील अंतर्गत गावांतील शेतकऱ्यांचा मुरूम नेऊनही रक्कम अदा न केल्याचा व मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली. आंदोलनाची तीव्रता पाहता सेनगावचे नायब तहसीलदार सरोदे, हिंगोलीचे गुण नियंत्रण अधिकारी काळे आणि पंचायत समितीचे गट विस्तार अधिकारी देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. अधिकाऱ्यांनी मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर गोरेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार  भिंगारे यांच्या मध्यस्थीने रास्ता रोको आंदोलन (Farmers' Organization Protest) स्थगित करण्यात आले.  
  
यावेळी (Farmers' Organization Protest) संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिला की, शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास मंत्रालय, मुंबई येथे तीव्र आंदोलन छेडले जाईल. या आंदोलनात गजानन कावरखे, नामदेव पतंगे, प्रवीण मते, श्याम मते, विठ्ठल वायचाळ, सखाराम भाकरे, अशोक जयस्वाल, दामोदर घुमणार, बबन कांबळे, विशाल पोळ, राहुल कावरखे, मनोहर सावके, संदीप मानमोठे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव सहभागी झाले होते. लेखी आश्वासनानंतर आंदोलन शांततेत मागे घेण्यात आले असले तरी मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Related to this topic: