Farmer Suicides: कळमनुरी तालुक्यातील सिंदगी येथील शेतकऱ्याने शेतातील नापिकीमुळे व कर्ज कसे फेडावे या चिंतेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.
आखाडा बाळापूर (Farmer Suicides) : कळमनुरी तालुक्यातील सिंदगी येथील शेतकऱ्याने शेतातील नापिकीमुळे व कर्ज कसे फेडावे या चिंतेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. याबाबत आज अकस्मात मृत्यूची नोंद पोलिस स्थानकात करण्यात आली. कळमनुरी तालुक्यातील विविध भागात सातत्याने शेतकरी आत्महत्या घटना घडत आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील सिंदगी येथील शेतकरी रावसाहेब बापुराव मगर (वय ५१ वर्षे) यांनी २४ जून रोजी रात्री दोन वाजता जाम शिवारातील शेतातील आखाड्यावर निसर्गाच्या चक्रामुळे शेतातील नापिकीमुळे बॅकेचे कर्ज कसे फेडावे या नैराश्यातून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.सदर शेतकऱ्यावर सन २०१९ ला युनियन बँक ऑफ इंडिया शाखा हिंगोली ७५ हजार रुपये कर्ज घेतले होते.
याबाबत गजानन बापुराव मगर माहितीनुसार अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आला.पुढील तपास पोलिस निरीक्षक शरद मरे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील रोहीणकर, बिट प्रमुख सुनील रिठे करत आहेत. कळमनुरी तालुक्यातील विविध भागात सातत्याने शेतकरी आत्महत्या घटना वरचेवर घडत आहेत मागील काही महिन्यात जवळपास पाच सहा शेतकरी आत्महत्या घटना घडलेल्या आहेत.शेतकरी आत्महत्या चिंता वाढवणारे आहे.