Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > शेती

शेतकरी आत्महत्या

शेतातील नापिकीमुळे आणखी एक शेतकऱ्याची आत्महत्या

Farmer Suicides: कळमनुरी तालुक्यातील सिंदगी येथील शेतकऱ्याने शेतातील नापिकीमुळे व कर्ज कसे फेडावे या चिंतेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.


शेतातील नापिकीमुळे आणखी एक शेतकऱ्याची आत्महत्या 

Farmer Suicides |

आखाडा बाळापूर (Farmer Suicides) : कळमनुरी तालुक्यातील सिंदगी येथील शेतकऱ्याने शेतातील नापिकीमुळे व कर्ज कसे फेडावे या चिंतेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. याबाबत आज अकस्मात मृत्यूची नोंद पोलिस स्थानकात करण्यात आली. कळमनुरी तालुक्यातील विविध भागात सातत्याने शेतकरी आत्महत्या घटना घडत आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कळमनुरी तालुक्यातील सिंदगी येथील शेतकरी रावसाहेब बापुराव मगर (वय ५१ वर्षे) यांनी २४ जून रोजी रात्री दोन वाजता जाम शिवारातील शेतातील आखाड्यावर निसर्गाच्या चक्रामुळे शेतातील नापिकीमुळे बॅकेचे कर्ज कसे फेडावे या नैराश्यातून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.सदर शेतकऱ्यावर  सन २०१९ ला युनियन बँक ऑफ इंडिया शाखा हिंगोली ७५ हजार रुपये कर्ज घेतले होते.

याबाबत गजानन बापुराव मगर माहितीनुसार अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आला.पुढील तपास पोलिस निरीक्षक शरद मरे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनील रोहीणकर, बिट प्रमुख सुनील रिठे करत आहेत. कळमनुरी तालुक्यातील विविध भागात सातत्याने शेतकरी आत्महत्या घटना वरचेवर घडत आहेत मागील काही महिन्यात जवळपास पाच सहा शेतकरी आत्महत्या घटना घडलेल्या आहेत.शेतकरी आत्महत्या चिंता वाढवणारे आहे.

Related to this topic: