Breaking News
  • राजपाल यादव यांना तुरुंगवास; चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
  • 'मिमिक्री आर्टिस्ट' म्हणत फडणवीसांचा राज ठाकरेंना टोला; 'भाडे के टट्टू'वरून सुरू झालेल्या वादाला विधानसभेत उत्तर
  • देशात पुन्हा कोरोनाची धास्ती! आंध्र प्रदेशात 46 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू; उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा नाही
  • तेलंगणात भात रोवणीसाठी गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांची पिकअप उलटली; 4 जणांचा जागीच मृत्यू , 27 जखमी
  • शूज कारखान्यात भीषण आग दुर्घटना; आगीत जळून 28 जणांचा मृत्यू
  • Stock Market Update : TCS च्या दमदार निकालांचा बाजाराला बूस्ट; सेन्सेक्स-निफ्टीत 1% पेक्षा अधिक उसळी
  • “…अन् चाललेत मिसिंग लिंकचा मुका घ्यायला”; जयंत पाटील यांच्या टीकेला गोपीचंद पडळकरांचे प्रत्युत्तर
  • काँगोत इबोलाचा कहर! १,७९२ बाधित, ६२५ जणांचा मृत्यू; संयुक्त राष्ट्रांकडून तातडीच्या जागतिक हस्तक्षेपाचे आवाहन
  • WhatsApp चे नवे Birthday Reminder फीचर लवकरच; मित्र-नातेवाईकांचे वाढदिवस विसरण्याची चिंता संपणार

होम > शेती

मानोरा पिक नुकसान

वन्य प्राण्यांनी केलेल्या पिक नुकसानीची भरपाई द्यावी!

Manora Crop Damage: मौजे चिस्तळा शिवारातील शेतकऱ्यांनी सोयाबीन तूर पिकांना रानडुक्करांच्या कळपाने नुकसान झाले. २ लाख ४५ हजारांची भरपाई मागणी करून पंचनामा देण्यात आला.


वन्य प्राण्यांनी केलेल्या पिक नुकसानीची भरपाई द्यावी

Manora Crop Damage |

मानोरा (Manora Crop Damage) : तालुक्यातील मौजे चिस्तळा शिवारात पेरणी केलेल्या ३ शेतकऱ्यांच्या सहा एकर शेतीमधील सोयाबीन व तूर पिकांचे रान डुकरांच्या कळपाने नुकसान केले असुन पिकांची पाहणी व पंचनामा करून शासनाची नुकसान भरपाई द्यावी, असे तहसीलदार राजेंद्र पाटील यांना निवेदन दि. ९ जुलै रोजी नुकसानग्रस्त बाधीत शेतकऱ्यांच्यावतीने देण्यात आले आहे. 

दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मौजे चिस्तळा शिवारातील शेतकरी पीयूष अरुण राठोड, शुभम अरुण राठोड यांच्या शेत सर्व्हे नंबर २१/१,  २१/२ व सुयेश सुनील हनुमंते आणि शेत सर्व्हे नंबर २१/१ अ यांचे शेतात दि. ७ जुलै रोजी सोयाबीन आणि तूरची खरिपाची पेरणी करण्यात आली आहे. शेतात पेरणी (Manora Crop Damage) केलेले पिकाची पाहणी करण्याकरिता दुसऱ्या दिवशी सायंकाळच्या सुमारास शेतात शेतकरी गेले असता रानडुक्कराने पेरलेले पूर्ण पिक उध्वस्त केले असल्याचे दिसून आले.

यामध्ये शेतकऱ्यांचे २ लक्ष ४५ हजाराचे नुकसान झाले असल्याने पंचनामा करून मोबदला देण्याची मागणी बाधीत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या वतीने करण्यात आली असून. निवेदन देतेवेळी अरुण राठोड, हनुमंते व चव्हाण उपस्थित होते.

Related to this topic: