Breaking News
  • विदर्भात गेल्या बारा दिवसांपासून पावसाचा खंड
  • Gadchiroli : जपतलाई घटनेतील दोषींवर कठोर कारवाई; ५१३ आश्रमशाळांचे थर्ड पार्टी ऑडिट
  • कुंभमेळ्यासाठी १३ प्रमुख आखाड्यांसह धार्मिक संस्थांनाही पायाभूत सुविधांसाठी १५ लाखांपर्यंत निधी मिळणार
  • दोडामार्ग पाळये गावात हत्तींचा धुमाकूळ; माड, व केळी बागा उद्ध्वस्त
  • Nashik : आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
  • शिवप्रतिष्ठान युवाच्यावतीने दीप प्रज्वलन करून दीप अमावस्या साजरी
  • Ratnagiri : रत्नागिरीतल्या पालीत वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
  • Ahilyanagar : कॅफेच्या नावाखाली गैरकृत्य, श्रीरामपूरमध्ये पोलिसांची 4 कॅफेवर छापेमारी
  • Nanded : झेंडूच्या फुलशेतीतून शेतकऱ्याला मिळाला आर्थिक आधार

होम > शेती

विदर्भ शेतकरी मागणी

विदर्भातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी केंद्रीय कृषिमंत्र्यांना निवेदन

Vidarbha Farmers' Demand: विदर्भातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडे लक्ष वेधत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजजी चव्हाण यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.


विदर्भातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी केंद्रीय कृषिमंत्र्यांना निवेदन

Vidarbha Farmers' Demand |

शेतकरी विकास मंच व्दारे मा. तहसिलदार आणि कृषी अधिकारी पारशिवनी मार्फ निवेदन

कन्हान (Vidarbha Farmers' Demand) : विदर्भातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडे लक्ष वेधत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजजी चव्हाण यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. या निवेदनात राज्यातील कर्जमाफीची रक्कम अद्याप अनेक शेतकऱ्यांना न मिळाल्याचा, धान बोनस प्रलंबित असल्याचा तसेच आग लागुन पिकांचे नुकसा न झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळालेली नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. 

निवेदनानुसार विदर्भात पावसाअभावी दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असुन भात, तूर, कापु स आदी पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्य ता निर्माण झाली आहे. याशिवाय कर्जमाफीची रक्कम बँकांपर्यंत न पोहोचल्याने शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळण्यास अडचणी येत असल्याचा दावाही करण्यात आला आहे. तसेच नागपुर जिल्ह्याच्या पारशिवनी तालुक्यात आग लागुन गहु पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना चार महिन्यांनंतरही आर्थिक मदत मिळा लेली नसल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.

राज्य सरकारने पुन्हा १ रू. पीक विमा योजना सुरू करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, धान बोनस व (Vidarbha Farmers' Demand) कर्जमाफीची रक्कम तत्काळ वितरित करावी, अशी मागणी मा. सुरेश वाघचौरे तह सिलदार पारशिवनी आणि मा. राकेश वसु तालुका कृषी अधिकारी पारशिवनी यांच्या मार्फत निवेदन मा. शिवराजजी चव्हाण, कृषी मंत्री भारत सरकार, नवी दिल्ली हयाना पाठवुन शेतकरी विकास मंच व्दारे भगवानदास यादव, शांताराम जळते, राजु गुरधे, सुरेश मेश्राम, विशाधर कांबळे, गणेश कांबळे, बळीराम सातपैसे, रामकृष्ण हुड, प्रविण सतदेवे, निर्मला मरकाम, सुनीता कांबळे आदि सह शेतक-यांनी केली आहे.

Related to this topic: