Breaking News
  • बदलापुरात तुकाराम मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
  • देशाची शिक्षणव्यवस्था बदलावी लागेल- राहुल गांधी
  • मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून सांगलीत जल्लोष
  • आषाढी निमित्त काढण्यात आलेल्या रथ उत्सवात प्रयास मित्र मंडळाने देखाव्यातून मांडले 'नीट' पेपर फुटीचे दाहक वास्तव
  • युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडलं - शरद पवार
  • TET पेपर फुटी प्रकरणातील मास्टर माईंड बिजेदरं कुमार गुप्ता सह इंद्रजित सिंग ला 30 जुलै पर्यंत पोलीस कोठडी
  • केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनाम्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसह विविध संघटनेचा जल्लोष....
  • छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज भागातील प्रति पंढरपूर येथे विठ्ठल भक्तांची गर्दी
  • संभाजीनगरच्या प्रति पंढरपूर येथे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सुरू विठ्ठल रुक्माईची पूजा

होम > शेती

पाझर तलाव कोरडे

जुलै महिना संपत आला तरी पावसाची प्रतीक्षा; पाझर तलाव अजूनही कोरडे, शेतकरी चिंतेत

Pazar Lake Dry: पावसाअभावी शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली असून अनेक शेतकऱ्यांनी पेरणी लांबणीवर टाकली आहे.


जुलै महिना संपत आला तरी पावसाची प्रतीक्षा पाझर तलाव अजूनही कोरडे शेतकरी चिंतेत

Pazar Lake Dry |

 

वन्य प्राण्यांसह जनावरांची पाणी पिण्यासाठी भटकंती

पानकनेरंगाव (Pazar Lake Dry) : जुलै महिना  अर्धा झाला तरी परिसरात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे अनेक पाझर तलाव अजूनही कोरडे ठाक पडले असून पाण्याची पातळी अत्यंत कमी होत चालली आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. खरीप हंगाम धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली असून अनेक शेतकऱ्यांनी पेरणी लांबणीवर टाकली आहे.

काही ठिकाणी झालेली पेरणीही पुरेशा पावसाअभावी संकटात सापडली आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकरी आता आकाशाकडे डोळे लावून बसले असून लवकरच मुसळधार पाऊस पडावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.  दरम्यान, पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया: दिलीप विश्वनाथ आरे शेतकरी
परिसरातील पाझर तलावांमध्ये पाणीसाठा (Pazar Lake Dry) नसल्याने जनावरे आणि वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे बहुतांश तलाव कोरडेठाक पडले असून पाण्याअभावी जनावरे आणि वन्यप्राणी  भटकंती करताना दिसत आहेत. लवकरच समाधानकारक पाऊस पडून तलाव पुन्हा भरावेत आणि जनावरे तसेच वन्यप्राण्यांची पाण्याची समस्या दूर व्हावी, अशी अपेक्षा ग्रामस्थ व शेतकरी व्यक्त करत आहेत.

प्रतिक्रिया: माणीक पल्हाद आरघडे शेतकरी
सेनगाव तालुक्यातील खैरखेडा,महाळशी, शिंदेवाडी,सावरखेडा सूलदली,पानकनेरगासह आदी गावात जोरदार पाऊस न झाल्यामुळे परिसरातील ओढ्या नाल्यांवरील बंधारे व पाझर तलाव कोरडे ठाक आहेत. पेरणी केलेले सोयाबीन पिकाची उगवण झाली नाही. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट काही शेतकऱ्यांवर आले आहे.

प्रतिक्रिया: गजानन शंकर पूरी शेतकरी
जुलै महिना अर्धा संपत गेला असला तरी पानकनेरगाव परिसरात  अद्याप ओढ्यांना पाणी आले नाही. परिणामत राष्ट्रीय महामार्ग ते खैरखेडा रस्त्यालगत  असलेला बेलदरी पाझर तलाव अजूनही कोरडाठाक आहे. तसेच या तलावाच्या बाजूलाच गावाला (Pazar Lake Dry) पाणी पुरवठा करणारी जलजीवन मिशनची विहीर सुद्धा आहे. या विहिरीच्या भरोशावर गावाची तहान भागवली जाते सदर पावसाची अशीच परिस्थिती राहिल्यास नजीकच्या काळात पाणी टंचाईची समस्या निर्माण होईल, अशी परिस्थिती आहे

Related to this topic: