Breaking News
  • सुवेंदू अधिकारी होणार बंगालचे नवे मुख्यमंत्री; रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती
  • 'थलपथी' विजयला मिळाले बहुमत; मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा!
  • 'निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांना सहआरोपी करा', मंत्री संजय शिरसाट यांची मागणी
  • विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
  • रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या मराठी चित्रपटाने 50 कोटींचा टप्पा ओलांडत मोठे यश मिळवले आहे आणि 75 कोटींकडे वाटचाल सुरू आहे.
  • राज्यातील सुमारे 16 लाख विद्यार्थ्यांसाठी दहावीचा निकाल आज जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी अधिकृत वेबसाईट आणि डिजीलॉकरवर निकाल पाहू शकतात.
  • नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 4,796 धारदार शस्त्रांचा साठा जप्त केला आहे. तलवारी, गुप्ती आणि चाकू यांचा मोठा साठा सापडल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी एकदिवसीय शस्त्र जप्ती मानली जात आहे
  • महाराष्ट्र SSC 2026 निकालात लातूर विभागाने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. राज्यातील 179 विद्यार्थ्यांनी 100% गुण मिळवले असून त्यापैकी सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातील आहेत.
  • गडचिरोली जिल्ह्यातील APR सॅक प्लांटवरील 72 दिवसांचे आंदोलन अखेर संपले. कामगारांच्या नोकऱ्या सुरक्षित ठेवत आर्थिक भरपाईसह करार झाला आहे.

होम > शेती

हिंगोली कृषी केंद्र

हिंगोली जिल्ह्यात ७५० कृषी सेवा केंद्रे सलग दुसर्‍या दिवशीही बंद

Hingoli krushi Kendra: हिंगोली जिल्ह्यात ७५० कृषी सेवा केंद्रे दुसर्‍या दिवशीही बंद राहिली. मागण्यांच्या प्रलंबिततेमुळे विक्रेत्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केले आहे, अवैध बियाणे व खत विक्रीवर विरोध.


हिंगोली जिल्ह्यात ७५० कृषी सेवा केंद्रे सलग दुसर्‍या दिवशीही बंद

Hingoli krushi Kendra |

 

प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन, लिंकिंग' सह अटींना विरोध

हिंगोली (Hingoli krushi Kendra) : राज्यासह जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ राज्य कृषी विक्रेते संघटनेने (माफदा) पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनात हिंगोली जिल्हा सामील झाला आहे. सोमवार पासून सर्व कृषी सेवा केंद्रे  बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून,दुसर्‍या दिवशी २८ एप्रिल मंगळवार रोजी जिल्ह्यातील ७५० कृषी केंद्र बंद होती.

गेल्या चार-पाच वर्षांपासून खत कंपन्यांकडून होणारे लिंकिंग, अवैध बियाण्यांची विक्री आणि प्रशासनाचे जाचक नियम यांबाबत माफदा सातत्याने पाठपुरावा करत आहे. मात्र, कृषी विभागाकडून केवळ आश्वासने मिळत असल्याने अखेर टोकाचे पाऊल उचलण्यात आले आहे. धुळे जिल्हा सीड्स, पेस्टीसाईड्स, फर्टिलायझर डीलर्स वेलफेअर असोसिएशनने या बंदला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे.

लिंकिंगमुळे शेतकर्‍यांना नको असलेली उत्पादने घ्यावी लागतात, तसेच अवैध बियाण्यांमुळे त्यांचे नुकसान होते. हा बंद केवळ विक्रेत्यांसाठी नसून शेतकर्‍यांच्या हितासाठीही आहे. शासनाने लेखी निर्णय घेतल्याशिवाय माघार घेतली जाणार नाही, असे माफदा'च्या जिल्हा पदाधिकार्‍यांनी सांगितले. मे महिना जवळ येत असल्याने शेतकरी खते आणि बियाण्यांच्या खरेदीसाठी सज्ज होत आहेत. अशा वेळी जिल्ह्यातील शेकडो (Hingoli krushi Kendra) कृषी सेवा केंद्रे बंद राहिल्यास निविष्ठांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो.

Related to this topic: