Breaking News
  • रायगड पोलिस दलातील ऑस्कर श्वान काळाच्या पडद्याआड
  • Gadchiroli : दिना नदीला पूर; आष्टी–आलापल्ली- सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग बंद
  • परभणी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच दमदार पावसाची हजेरी शेतकऱ्यांना दिलासा
  • ‘रॅपिडो बाईक टॅक्सी’ निर्णयाविरोधात चालक मालक संघटनांचा नवी मुंबईत एल्गार
  • पुणे ग्रामीण जिल्ह्यात ड्रोन उडवण्यासाठी पोलिस परवानगी लागणार
  • दहीहंडी फोडून शिर्डीतील तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता
  • नीट परीक्षेचे कारण सांगून देशात अराजकता माजवणे आणि देशाला असुरक्षित करणे या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी मुकमोर्चा
  • लासलगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर रोड रॉबरी; व्हॅगनारची काच फोडून 70 हजारांची रोकड लंपास
  • रत्नागिरी- अरबी समुद्रात चक्राकार आणि बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव वाढला

होम > शेती

शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्यावी; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे राज्यपालांना निवेदन

Farmers'' Loan Waiver Andolan: महाराष्ट्रातील शेतकर्यांचा आर्थिक दबाव खूप वाढला असल्यासारखे नोंदवले गेले आहे. युवासेनाने रायज्यपालाला कर्जमुक्ती योजनेच्या तटस्थतेचा मागणा केला आहे.


शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्यावी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे राज्यपालांना निवेदन

Farmers' Loan Waiver Andolan |

चिखली (Farmers' Loan Waiver Andolan) : महाराष्ट्रातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत नवीन निकष लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याने अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्यावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर डफडे बजाव आंदोलन (Farmers' Loan Waiver Andolan) करण्यात आले. 

यावेळी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख नंदु कराडे शहरप्रमुख श्रीरामभाऊ झोरे उपजिल्हाप्रमुख विलास सुरडकर तालुकाप्रमुख किसनराव धोंडगे युवा सेना शहरप्रमुख आनंद गैची यांच्या सह शिवसैनिक उपस्थिती होते. यावेळी तहसीलदार मार्फत महाराष्ट्राचे राज्यपाल. विष्णूदेव वर्मा यांना निवेदन देण्यात आले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आंदोलनाचे (Farmers' Loan Waiver Andolan) आयोजन करण्यात होते.

तहसीलदारांमार्फत राज्यपालाला दिलेल्या  निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग सध्या मोठ्या आर्थिक अडचणीत असून शेतीमालाला योग्य भाव, वाढता उत्पादन खर्च आणि नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने सहा महिन्यांपूर्वी कर्जमाफीची घोषणा केली असली तरी त्यासाठी नवीन निकष लावले जात असल्याने अनेक पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहू शकतात.

यामुळे राज्यपालांनी या गंभीर प्रश्नाकडे तात्काळ लक्ष घालून शिवसेना पक्षप्रमुख  उद्धवसाहेब ठाकरे यांनी मांडलेल्या कर्जमुक्ती योजनेच्या धर्तीवर राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कोणत्याही अटी-शर्तींशिवाय सरसकट कर्जमुक्ती जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Related to this topic: