Breaking News
  • साताऱ्यातील पाथरपुंजला सर्वात जास्त पावसाची नोंद
  • लोणावळ्यात 24 तासात 94 मिलिमीटर पावसाची नोंद.
  • सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
  • पुण्यातील स्टील गोडाऊनवर गोळीबार प्रकरणी वापरण्यात आलेली बाईक पोलिसांकडून जप्त
  • विलास घुले हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केज पोलीस ठाण्यासमोरील आंदोलकांना फोन
  • जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
  • अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात दमदार पाऊस
  • नाशिकच्या सातपूर एमआयडीसी परिसरात एका कंपनीला भीषण आग
  • महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधात सोलापुरातील मनसे झाली आक्रमक

होम > शेती

शेतकरी आमरण उपोषण

न्यायासाठी वृद्ध शेतकऱ्यांचे शेतातच आमरण उपोषणाला सुरुवात

Farmer Hunger Strike: तालुक्यातील पोहरादेवी येथील वृध्द शेतकरी विमल सुखदेव चव्हाण आणि सुखदेव शामराव चव्हाण यांनी शेतजमिनीची नोंद घेऊन गैरअर्जदार शरद गणपत राठोड व मोरसिंग देवीसिंग राठोड


न्यायासाठी वृद्ध शेतकऱ्यांचे शेतातच आमरण उपोषणाला सुरुवात

Farmer Hunger Strike |

 

शेतजमिनीची नोंद घेऊन, सावकारी गुन्हा दाखल करावा!

मानोरा (Farmer Hunger Strike) : तालुक्यातील पोहरादेवी येथील वृध्द शेतकरी विमल सुखदेव चव्हाण आणि सुखदेव शामराव चव्हाण यांनी शेतजमिनीची नोंद घेऊन गैरअर्जदार शरद गणपत राठोड व मोरसिंग देवीसिंग राठोड यांच्यावर सावकारी गुन्हा दाखल करून न्याय द्यावा, या (Farmer Hunger Strike) मागणीसाठी दि. १० जून पासून शेतातच आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

ठाणेदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, पोहरादेवी येथील गट नंबर ६२ मध्ये पोहरादेवी शिवारात १ हेक्टर २१ आर आमची शेतजमीन आहे. ३ - ४ वर्षापूर्वी सदरील शेत जमीन ही शरद गणपत राठोड यांच्याकडे ३ लक्ष रुपये उसनवार घेऊन गहाण खरेदी खत करून दिले होते. उसनवार घेतलेली रक्कम थोडी थोडी करून परत दिले. परंतु त्याने शेत जमिनीचे खरेदी खत परत करून दिले नाही. याबाबत गावातील पंच मंडळींनी तोडगा काढला असता तरीही जमीन खरेदी खत करून देण्यास नकार देत आहे.

सदरील उसनवारीचा व्यवहार हा साक्षीदार संजय देविदास राठोड व संजय शेषराव जाधव यांच्या समक्ष झालेला आहे. (Farmer Hunger Strike) शेतीची नोंद घेण्यासाठी प्रशासनाकडे वारंवार विनंती केली असता नोंद घेतली जात नाही. त्यामुळे वरील गैरअर्जदार यांच्याविरुद्ध सावकारी गुन्हा दाखल करून न्याय द्यावा, या मागणीसाठी वृद्धांनी आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे.