Breaking News
  • माजलगावात अल्पवयीन विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात? अतिरक्तस्रावानंतर तरुणी बेपत्ता
  • लातूर तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर 17 जण जखमी
  • वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू
  • सलग पाचव्या दिवशी भंडाऱ्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी
  • फसव्या कर्जमाफीविरोधात रविकांत तुपकरांचा एल्गार; उद्यापासून अन्नत्याग आंदोलन
  • FSSAI कंपनीची मोठी कारवाई, ८ फूड कंपन्याना पाठवली नोटीस
  • अण्णा हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा
  • पेरणीची घाई करू नका; दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते : मेघना बोर्डीकर
  • नांदेड जिल्ह्यात पाऊस वादळीवारासह पावसाची हजेरी

होम > शेती

परभणी शेतकरी आंदोलन

परभणीत गोदाकाठ कारखान्यासमोर शेतकर्‍यांचे आंदोलन

Parbhani Farmers Andolan: पाथरी तालुक्यातील थकीत ऊस बिलांच्या प्रश्नावरून गोदाकाठ ऑरगॅनिक साखर कारखान्यासमोर आत्मदहनाचा इशारा दिलेल्या  ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी सोमवार  १ जून रोजी सकाळी १० ते दुपारी १


परभणीत गोदाकाठ कारखान्यासमोर शेतकर्‍यांचे आंदोलन 

Parbhani Farmers Andolan |

लेखी आश्वासनानंतर  १० जूनपर्यंत मुदत पोलीस व महसुल प्रशासनाची मध्यस्थी

परभणी (Parbhani Farmers Andolan) : पाथरी तालुक्यातील थकीत ऊस बिलांच्या प्रश्नावरून गोदाकाठ ऑरगॅनिक साखर कारखान्यासमोर आत्मदहनाचा इशारा दिलेल्या  ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी सोमवार  १ जून रोजी सकाळी १० ते दुपारी १ वा.दरम्यान  कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. यावेळी महसूल व पोलीस प्रशासनाने घटनास्थळी भेट देत आंदोलक शेतकर्‍यांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणली.कासापुरी सर्कलसह परिसरातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी मागील गाळप हंगामात कारखान्यास ऊस पुरवठा केला होता.

मात्र फेब्रुवारी व मार्च महिन्यातील गाळपाचे ऊस बिल अद्यापही मिळाले नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. याच (Parbhani Farmers Andolan) पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांनी यापूर्वी प्रशासनाकडे निवेदन देऊन थकीत रक्कम तत्काळ अदा न झाल्यास कारखान्याच्या गेटसमोर आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या इशार्‍यानंतर सोमवारी ऊस उत्पादक शेतकरी कारखाना परिसरात एकत्र आले होते. आंदोलनाची माहिती मिळताच महसूल विभाग व पोलीस प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोनि. लक्ष्मण केंद्रे यांनी  मध्यस्थी करत आंदोलक शेतकरी व कारखाना प्रशासन यांच्यात चर्चा घडवून आणली.

चर्चेदरम्यान कारखाना प्रशासनाने शेतकर्‍यांची थकीत देयके अदा करण्यासाठी येत्या १० जूनपर्यंत मुदत देण्यात यावी अशी लेखी विनंती शेतकर्‍यांना  केली. तसेच गाळपासाठी ऊस पुरवठा केलेल्या शेतकर्‍यांचे व तोड वाहतूकदारांचे थकीत बिल अदा करण्याची हमी म्हणून पाच कोटी रुपयांचा धनादेश अनामत स्वरूपात शेतकर्‍यांकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.कारखाना प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर व प्रशासनाच्या मध्यस्थीमुळे शेतकर्‍यांनी सद्यस्थितीत आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. (Parbhani Farmers Andolan) आगामी खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकर्‍यांना शेतीच्या विविध कामांसाठी पैशांची नितांत गरज आहे. त्यामुळे थकीत ऊस बिले वेळेत मिळावीत अशी मागणी आंदोलक शेतकर्‍यांनी पुन्हा एकदा प्रशासनासमोर मांडली.